ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीवरुन काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनी सांगली आणि धारावीतल्या जागांवर उद्धव ठाकरेंना थेट आघाडी धर्म पाळला नाही असं म्हणत आठवण करुन दिली आहे. तसंच या जागांचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. तर संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकर यांना खिचडी चोर संबोधलं आहे.

काय म्हटलं आहे संजय निरुपम यांनी?

अमोल किर्तीकर खिचडीचोर आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून त्यांना उमेदवारी कशी दिली? उद्धव ठाकरेंनी आघाडीचा धर्म पाळला नाही. एवढंच काय तर खिचडी चोराला उमेदवारी दिलीच कशी असा प्रश्न विचारला आहे. इतकंच काय आम्ही खिचडी चोराचा प्रचार करणार नाही काही प्रश्नच येत नाही असा आक्रमक पवित्रा संजय निरुपम यांनी घेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.

Rajan vichare, nomination,
राजन विचारे करणार २९ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी
What Vishal Patil Said?
विशाल पाटील यांचा गंभीर आरोप, “मला चिन्ह मिळू नये म्हणून प्रयत्न झाले, तसंच माझं नाव..”
sharad pawar
आघाडीत बिघाडी? मित्रपक्षाचं शरद पवारांना पत्र; प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख करत म्हणाले, “काँग्रेसच्या चुकांचं पापक्षालन…”
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”

संजय निरुपम अमोल किर्तीकरांना खिचडी चोर का म्हणाले?

संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकरांना खिचडी चोर म्हटलं कारण करोना काळात गरीबांना खिचडी देण्याचं जे कंत्राट आहे त्यात अमोल किर्तीकरांनी आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळेच त्यांना ईडीचं समन्सही पाटवण्यात आलं आहे. ठाकरे गटाने १७ नावांची यादी जाहीर केली. मात्र त्यातल्या सांगलीच्या चंद्रहार पाटील यांच्या नावावरुन आणि मुंबई उत्तर पश्चिम मधल्या अमोल किर्तीकरांच्या जागेवरुन काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

हे पण वाचा- “उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला असता तर..”, ठाकरे गटाच्या यादीवर काँग्रेसची तीव्र नाराजी

संजय निरुपम म्हणाले की, उबाठा गटाने ज्यांची उमेदवारी जाहीर केली ते अमोल किर्तीकर हे भ्रष्टाचारातील आरोपी असून त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. करोना काळात मुंबई महानगरपालिकेने गरीब कामगारांना खिचडी वाटप करण्याचा एक चांगला उपक्रम सुरू केला होता. मात्र ठाकरे गटाच्या लोकांना हे खिचडी वाटप करण्याचे कंत्राट दिले गेले. या कंत्राटात कमिशन खाल्ल्याचा आरोप अमोल किर्तीकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गरीब कामगारांची खिचडी खाणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी का देण्यात आली आहे? असं म्हणत त्यांनी अमोल किर्तीकरांचा उल्लेख खिचडीचोर असा केला आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. आता निरुपम यांना ठाकरे गटाकडून उत्तर दिलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.