प्रकाश आंबेडकर यांचा दावा

लातूर : सर्व प्रश्नांची गुरुकिल्ली ही सत्ता आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्रश्नाच्या पाठीमागे उभे राहणारे सत्ताधारी हवेत. म्हणून वंचितच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

PM Narendra Modi (2)
मुस्लीम समाजाबाबत मोदींचं घूमजाव! ‘मंगळसूत्र खेचतील’ पासून ‘ताजियाच्या मिरवणुकी’पर्यंत काय काय म्हणाले?
Loksabha election 2024 PM Modi candidature Varanasi four proposers
दलित, ब्राह्मण आणि दोन ओबीसी! वाराणसीमध्ये उमेदवारी भरताना मोदींचे प्रस्तावक कोण होते?
Political controversy over Prajwal Revanna inquiry
प्रज्वल रेवण्णाच्या चौकशीवरून राजकीय वाद; भाजप सीबीआयसाठी आग्रही तर मुख्यमंत्री ‘एसआयटी’ तपासावर ठाम
Sharad Pawar criticized the country dictatorship under the leadership of Modi in the welfare meeting
मोदींच्या नेतृत्वाखाली देश हुकूमशाहीकडे ! कल्याणच्या सभेत शरद पवारांची टीका
Is private property community resource supreme court reserves verdict
खासगी मालमत्ता ‘सामाजिक भौतिक संसाधने’ नव्हेत?
Why was Harvey Weinstein conviction overturned in the MeToo case
#MeToo प्रकरणातील अत्याचारी हार्वे वाइनस्टीन यांची शिक्षा रद्द का झाली? चळवळीला धक्का बसणार?
palghar lok sabha election 2024, bahujan vikas aghadi palghar marathi news
पालघरमध्ये ठाकूरांचा उमेदवार महायुतीच्या विरोधात रिंगणात
narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप

वंचित बहुजन विकास आघाडीच्यावतीने आयोजित धनगर आरक्षण हक्क मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अ‍ॅड. अण्णाराव पाटील, प्रा. सुभाष भिंगे, प्रा. यशपाल भिंगे, अ‍ॅड. मंचकराव डोणे, सुभाष माने आदी उपस्थित होते.

आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणाला आपण पािठबा दिला होता, तेव्हा अनेकांनी या समाजाला आरक्षणाची गरज काय, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा आरक्षण मिळाल्यामुळे आपले प्रश्न मार्गी लागतील, असे कोणाला वाटत असेल तर आरक्षण दिले पाहिजे ही आपली भूमिका होती. एकदा आरक्षण दिले. आता नव्या विषयाची चर्चा केली जाऊ शकते. आदिवासी मंडळींना आपल्या आरक्षणात कोणाची आडकाठी येईल असे वाटत होते तेव्हा त्यांच्या मेळाव्यात जाऊन शासनाने नव्याने सुरू केलेली डीटीएच शिष्यवृत्ती योजना बंद व्हावी, अशी त्यांची मागणी होती. या नव्या योजनेत थेट पैसे खात्यावर दिले जातात. हे पैसे खर्च कसे करायचे हे समजत नसल्याने त्या मुलांचे शिक्षण बंद पडले आहे.

नव्याने आपले सरकार आल्यानंतर वसतिगृहाची जुनी योजना सुरू ठेवली जाईल असे मी त्यांना सांगितले आहे. धनगरांचा आरक्षणाचा प्रश्न हा फार मोठा नाही.

सर्वानी संघटितपणे एकत्र उभे राहिले तर हा प्रश्न मिटेल. राज्यात विधानसभेत २८८ आमदारांपैकी केवळ सहा-सातजणच धनगर समाजाचे आमदार राहिले, त्यामुळे प्रश्न मार्गी लागला नाही. धनगर समाजाच्या आमदारांबरोबर या प्रश्नाच्या पाठीशी राहणारे सरकार सत्तेत आले पाहिजे. त्यासाठी सर्वानी कटिबद्ध होण्याचे आवाहन आंबेडकर यांनी केले.