जिल्ह्य़ातील सिन्नर तालुक्यात रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत मुंबई येथील दोन मुलांसह चार ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईहून शिर्डीकडे जाणारी तवेरा कार सकाळी दहाच्या सुमारास पांढुर्ली शिवारात आली. या वेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने उलटली. या अपघातात प्रशांत राजा सुवर्णा (३२), रेखा प्रशांत सुवर्णा (२८) आणि शरण प्रशांत सुवर्णा (६) हे एकाच कुटुंबातील तिघे जण जागीच ठार झाले. अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरा अपघात देवनदीवरील पुलावर झाला. मुंबईहून शिर्डीकडे जाणारी इंडिका कार पहाटे देवनदीवरील पुलावर आली असता दुभाजकांवर जाऊन उलटली. या अपघातात अमन जितेंद्र यादव हा मुंबई येथील सहा वर्षांचा मुलगा
ठार झाला.
संग्रहित लेख, दिनांक 1st Jul 2013 रोजी प्रकाशित
नाशिकमधील दोन अपघातांत मुंबईचे चार जण ठार
जिल्ह्य़ातील सिन्नर तालुक्यात रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत मुंबई येथील दोन मुलांसह चार ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
First published on: 01-07-2013 at 07:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four died in two accidents in nashik