रत्नागिरी: ब्राझीलप्रमाणे कोकण देखील काजू उत्पादनात क्रांती करु शकतो. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करुन शेतकऱ्यांनी नव नवीन प्रयोग करावेत, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेमध्ये प्रयोगशील आणि विविध स्पर्धेतील विजयी शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, रत्नागिरीचा हापूस आंतरराष्ट्रीय दर्जावर विक्री करत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  जगातील विविध लागवडीकडे वळले पाहिजे. भात, नाचणी, फळबगांचे लागवड क्षेत्र वाढले पाहिजे. त्यासाठी आत्मपरिक्षण केले पाहिजे. नोकरीपेक्षा १० पट पैसे  शेतीमधून मिळवू शकतो. त्यासाठी शेती वाढविली पाहिजे.  शेतीसाठी शासनाने विविध योजना दिल्या आहेत. या योजनांचा फायदा घेवून शेती करायला हवी. निसर्ग सुधारायचा असेल आणि प्रक्रिया उद्योग निर्माण करायचा असेल तर बांबू लागवडीला पर्याय नाही. याठिकाणी पुढचे कृषी प्रदर्शन हे राज्यातील प्रथम क्रमांकाचे असेल, असेही पालकमंत्री म्हणाले.

फलोत्पादन मंत्री  गोगावले म्हणाले, फळबागा लागवडीसाठी १०० टक्के फलोत्पादन पूर्वीची शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना सुरु करणारा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला जाईल. दर्जेदार बियाणे, खते शेतकऱ्यांना वेळेत मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी तत्परतेने कार्यवाही करावी. फळबाग वाढीसाठीचे यंदाचे १९०० हेक्टर उद्दिष्ट पूर्ण करावे. म्हणजे मुंबईत होणारे स्थलांतर थांबेल. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना तयार करावे.  बांबूला ७ लाख सबसिडी दिली जाते. शिवाय तो टनावर विक्री होतो. त्यापासून प्रक्रिया उद्योगातून मोठा रोजगार आणि उत्पन्न मिळते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकऱ्यांसाठी जेवढं करता येईल तेवढं करत आहे. शासनाच्या योजनांचा फायदा घेवून शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय वाढवावा, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी  मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.