गेल्या दोन महिन्यांपासून ज्या दसरा मेळाव्यावरून राजकारण रंगलं होतं, तो मेळावा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या बुधवारी एकीकडे शिवाजी पार्कवर शिवसेनेचा तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी धुळ्यात बोलताना शिवसेनेवर तोंडसुख घेतलं. यावेळी त्यांनी एक भाकित वर्तवताना शिवसेनेला गंभीर इशाराही दिला आहे.

निवडणूक आयोगासमोर काय होणार?

धनुष्यबाण हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह नेमकं कुणाला मिळणार? याचा वाद आता सर्वोच्च न्यायालयातून निवडणूक आयोगासमोर आला आहे. यासंदर्भात आयोगासमोर सुनावणी झाल्यानंतर हे चिन्ह दोन्हींपैकी एका गटाला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा आत्तापर्यंत केला जात होता. मात्र, आता त्यापुढे एक पाऊल जात धनुष्यबाण आपल्याकडे आल्यानंतर शिवसेनेतले अजून आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
वसंत मोरेंच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

शिवसेनेत पाच आमदारही शिल्लक उरणार नाहीत, असा दावा गुलाबराप पाटील यांनी केला आहे. धुळ्यात सभेत बोलताना ते म्हणाले, “मी लिहून देतो.. ज्या दिवशी धनुष्यबाण आपल्याकडे येईल, १५ पैकी तिथे ५ आमदारही तिकडे दिसणार नाहीत. ते तर फक्त धनुष्यबाण इकडे येण्याची वाट पाहात आहेत”, असं पाटील यावेळी म्हणाले.

“ज्याच्याकडे जास्त आमदार, जास्त खासदार, ज्याच्याकडे पक्षाचे जास्त लोक असतात, त्याला चिन्ह मिळतं. आम्हाला खात्री आहे की, धनुष्यबाण आम्हालाच मिळेल”, असंही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात? गुलाबराव पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

“मेळावा ऑफलाईनच व्हावा, मजा येईल”

उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा ऑनलाईन झाला पाहिजे अशी टीका विरोधकांकडून होत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, “मेळावा ऑनलाईन नाही ऑफलाईनच झाला पाहिजे. मजा येईल”.