मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह परिसरातील कमाल तापमानात ५ अंशाने वाढ झाली. मात्र सोमवारपासून पुन्हा तापमानात हळूहळू घट होऊन कमाल तापमान २८ ते ३० अंशापर्यंत आणि किमान तापमान १८ ते २० अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रात गारवा कायम राहून राज्यात पुढील ४ ते ५ दिवस सौम्य थंडी जाणवण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडय़ातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हिवाळा आणि पावसाळा दोन्ही एकाच वेळी येणार असल्याने मिश्र वातावरणाची शक्यता आहे.

गेल्या आठवडय़ात कडाक्याची थंडी पडल्यानंतर तापमानात वाढ झाली. त्यामुळे उष्ण झळा नागरिकांना सोसाव्या लागत होत्या. आता पुन्हा तापमानात किंचितशी घट होऊन कमाल तापमान २८ अंश आणि किमान तापमान १८ अंशापर्यंत येण्याची शक्यता आहे.

Three thousand winter fever in the maharashtra state in a month Mumbai
राज्यात महिनाभरात हिवतापाचे तीन हजार, तर डेंग्यूचे दोन हजार रुग्ण
water leaking, petrol tank, two-wheeler,
दुचाकी- कारच्या पेट्रोलच्या टाकीतून पाणी निघतेय? तर इंजिनला धोका
navi mumbai morbe dam marathi news
मोरबे धरण ५१ टक्के भरले ! धरणात मागील काही दिवसांपासून दमदार पाऊस, आतापर्यंत १६२६ मिमी पावसाची नोंद
electricity demand maharashtra
राज्यात विजेच्या मागणीत मोठी घट; पावसामुळे…
Vidarbha is likely to get heavy rainfall and yellow alert has been issued for rain till July 10
विदर्भात पावसाचा ‘येलो अलर्ट’, पण कधीपर्यंत…?
mumbai rain updates heavy rain lashes mumbai heavy rain alerts in mumbai
दमदार मोसमी पावसाचा दिलासा; मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत पुढील दोनतीन दिवस मुसळधारांचा अंदाज
nashik water released from Kashyapi
नाशिक: दुष्काळात पाण्याचा अपव्यय; काश्यपीतील विसर्ग निम्म्यावर, वहनव्यय वाढणार
52 percent sowing
पावसाने सरासरी गाठली; पेरण्या ५२ टक्क्यांवर

दरम्यान, किमान तापमानात घट आणि कमाल तापमानात वाढ होत असून राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणसदृश परिस्थिती तयार झाली आहे. रविवारी सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ हवामानाची नोंद झाली. नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबादसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतील काही भागांत विजांच्या कडकडाटासह, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाहणारे वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

काही शहरातील किमान तापमान

(अंश सेल्सियसमध्ये)

* औरंगाबाद – १०.९

* बारामती – ११.४

* पुणे – १२.२ 

* नाशिक – १२.६

*  सातारा – १२.९ 

* महाबळेश्वर – १४.२ 

* जळगाव – १४.५ 

* गडचिरोली – १४.८ 

* उस्मानाबाद – १५.४

*   परभणी – १५.६ 

* नागपूर – १५.७

*  नांदेड – १५.८

*  माथेरान – १६