असदुद्दीन ओवैसींवर नवनीत राणा कौर यांनी टीका केली होती. एवढंच नाही तर इस देशमें रहना है तो जय श्रीराम बोलना पडेगा असंही आव्हान त्यांनी दिलं होतं. इम्तियाज जलील यांच्यासारखे किती आले आणि किती गेले, त्यांच्यात धमक असेल तर एकदा अमरावतीत लढून दाखववं आणि निवडून येऊन दाखवावं. जलील यावेळी संभाजी नगरातून कसे निवडून येतात तेच मी बघते असंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत. या सगळ्यावर आता इम्तियाज जलील यांनी उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले इम्तियाज जलील?

नवनीत राणा यांच्याबाबतीत मला एक म्हण आठवते. इन्सान कितना भी अच्छ क्यूँ न हो कुत्तेसे अच्छा भौंक नही सकता. मी हे नवनीत राणा यांना बोलत नाही. पण ज्या प्रकारे या महिला भाषा वापरत आहेत, मला सांगण्यात आलं आहे की त्या SC कॅटेगरीतून निवडून आल्यात. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं की नाही हे मला माहीत नाही. पण लोकसभेत त्या फक्त भाजपाकडून तिकिट हवं आहे म्हणून काही गोष्ट करत असतात. संविधान त्या विसरल्या आहेत. संविधानात बळजबरीची तरतूद नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imtiyaz jaleel answer to navneet rana he compares navneet rana with nathuram godse rno news scj
First published on: 22-02-2024 at 14:58 IST