सांगली : श्रावणाची अमावस्या झाली. गावातल्या आठ-दहा पोरांचा पार्टीचा बेत ठरला. ठिकाणही ठरले. तीन दगडाच्या चुलीवर मटणही रटरटत होते आणि डोंगरकपारीला झाडाच्या आडोश्यााला दोन डोळे दिपले. ते डोळे होते बिबट्याचे! पार्टीला आवतन न देता बिबट्या आल्याने पळता भुई थोडी अशी गत होऊन गाव कधी गाठले हे पार्टीच्या नादात जमलेल्या पोरांना कळलंच नाही.

वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर येथील तरूणांनी श्रावणातील सणवारामुळे मांसाहर वर्ज्य केला होता. रोजचे शाकाहारी खाऊन खाऊन कंटाळा आल्याने सामिष पार्टीचे आयोजन करण्याचे ठरले. रविवारी रात्रीच्या पार्टीसाठी जागाही डोंगरकपारीची निवडण्यात आली. पार्टीसाठी मटण, मसाला, तेल, वाटण, पाणी आणि भांड्याची व्यवस्थाही करण्यात आली. काही पोरं जेवणाच्या तयारीसाठी कडूस पडल्यापासून तळावर जमली होती. तर काही जण गावाचा कारभार आटोपून थोडासा उतारा टाकूनच येणार होती. तीन दगडाची चूल मांडली.

हेही वाचा : “पडळकरांसारखी चिल्लर व्यक्ती अजित पवारांना लांडगा म्हणत असेल, तर…”, काँग्रेस नेत्याचं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चुलीवर मटण रटरटत होतं. चुलीतून अग्निच्या ज्वाला बाहेर येत होत्या. या आगीच्या उजेडात कपारीच्या एका बाजूला असलेल्या झाडाजवळ दोन डोळे चमकले. पाहणार्‍याने मित्राला बघण्यास सांगितले. सर्वांचेच एकमत झाले की लपून पार्टीला आलेला बिबट्याच आहे. मग काय? समद्यांचीच पाचावर धारण बसली. चुलीवर शिजणारं मटण रटरटतच होतं. सगळं तिथंच टाकलं. आणि बिबट्याच्या भीतीने गावची वाट धरली.