सातारा: छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगडावर मंगळवारी रात्री ३६५ मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर अन् ‘जय भवानी… जय शिवाजी’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला. राज्यभरातील हजारो शिवभक्तांनी हा प्रज्वलित सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला.

प्रतापगडवासिनी भवानीमातेच्या मंदिरास ३५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर महोत्सव सुरू करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी नवरात्रोत्सवात मशाल महोत्सव साजरा केला जात असून, यंदा या महोत्सवाचे १५ वे वर्षे आहे. मंगळवारी रात्री भवानीमातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री पारंपरिक वाद्यांचा गजर व जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात मशाली करण्यात आल्या. भवानीमाता मंदिरापासून किल्ल्याच्या बुरुजापर्यंत पेटविण्यात आलेल्या माशालींनी गड व परिसर उजळून निघाला. किल्ल्याच्या चहुबाजूंनी करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे किल्ल्याचे सौंदर्य उजळून निघाले. गडावर आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा : Islampur Assembly Constituency: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचे वर्चस्व; महायुतीत इस्लामपूरची जागा कोणाला मिळणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किल्ले प्रतापगडावर नवरात्रीत दोन घट बसविले जातात. एक घट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, कारण शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तर दुसरा घट हा राजाराम महाराज यांच्या नावाने कारण त्यांनी स्वराज्याचा पाया मजबूत केला. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याचबरोबरच गेल्या १५ वर्षांपासून गडावर मशाल महोत्सवही साजरा केला जात आहे. ३६५ मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर अन् ‘जय भवानी… जय शिवाजी’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला. राज्यभरातील हजारो शिवभक्तांनी हा प्रज्वलित केला.