वसई : भारत देशात राहून सुद्धा येथील संस्कृती व धर्म याविषयीची माहिती नाही, अशा लोकांकडून सध्या हिंदू विरोधी विविध प्रकारची वक्तव्य केली जात आहेत. जे हिंदू विरोधी बोलतील त्यांचे समूळ उच्चाटन करू, असे प्रतिपादन भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वसईत केले. वसईत प्रखर राष्ट्र चेतना सभेच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

रविवारी वसईत संत धर्म सभा, वसई यांच्या तर्फे प्रखर राष्ट्र चेतना सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेपूर्वी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वसईतील पत्रकारांशी संवाद साधला. भारत हा देश आहे मात्र इंग्रजांनी त्याचे इंडिया करून देशाला बदनाम करण्याचे काम केले आहे. भारत हे सनातन राष्ट्र आहे आणि सनातन धर्म आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच जे हिंदू विरोधी वक्तव्य करून धार्मिक भावना भडकविण्याचे काम करीत आहे. काँग्रेसने सुध्दा देशाला एकत्रित ठेवण्याऐवजी देश विखुरण्याचे काम केले असल्याचा आरोप करीत साध्वी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने सतत जातीचे राजकारण केले आहे. भाजपा जातीचे राजकारण करीत नसून नवीन भारत हा विकसित भारत बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सुद्धा पूर्ण बहुमताचे सरकार येईल, असेही त्यांनी सांगितले.

Congress National Spokesperson Supriya Srineet demanded that Eknath Shinde and Devendra Fadnavis resign
शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
sanjay shirsat replied to uddhav thackeray
Sanjay Shirsat : “…तर मुख्यमंत्रीही विकृत आहेत”, म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाच्या नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसच्या मांडीवर बसून…”
kolhapur, Ichalkaranji bandh, Hindu oppression, Bangladesh, anti-Hindu activities, protest,
बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात इचलकरंजी बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद
Loksatta karan rajkaran Deputy Chief Minister Ajit Pawar refused to answer whether he would reunite with Sharad Pawar group
शरद पवारांशी हातमिळवणी बाबत अजित पवारांचे मौन
Eknath Shinde, Badlapur, Ladki Bahin Yojana,
लाडकं सरकार लक्षात ठेवा! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
kolkata rape case
Mamata Banerjee : “विरोधकांकडून राज्यात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न”; कोलकाता बलात्कार प्रकरणावरून ममता बॅनर्जींनी सुनावलं!
Devendra Fadnavis on Budget 2024
“मला अटक करण्याचा प्रयत्न एकदा नाही, तर चार वेळा झाला, पण…”; परमबीर सिंह यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

हेही वाचा : शरद पवारांशी नित्य संपर्काचा प्रफुल्ल पटेलांचा दावा सुप्रिया सुळे यांनी फेटाळला

हेही वाचा : उद्धव ठाकरेंकडून ‘मातोश्री’ची दारे तुमच्यासाठी उघडी असतील का? भरत गोगावले म्हणाले…

जे कोणी हिंदू विरोधी व हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य करीत असतील त्यांचे समूळ उच्चाटन केले जाईल. लव्ह जिहाद सारख्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविले जात आहे. याशिवाय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. यासाठी मुलींनीसुद्धा आपल्या आत्मरक्षणासाठी शस्त्र जवळ बाळगले तर काहीच चुकीचे नाही, असे त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ईडीची अनेक मोठ्या राजकीय नेत्यांवर कारवाई सुरू होती. मात्र भाजपा मध्ये आल्यानंतर ते निर्दोष कसे होतात? असा प्रश्न काही पत्रकारांनी साध्वी यांना विचारला. त्याला उत्तर देताना केवळ भाजपात आले म्हणून त्यांच्यावरील कारवाई थांबली असे नसून त्यांच्या चौकशी नंतर त्यांना निर्दोष सोडले आहे. ज्यांची चौकशी सुरू आहे त्यांच्यावर त्यानुसार कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगितले. आज वसईत सनातन धर्म व राष्ट्राविषयीची चेतना जगविण्यासाठी आले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.