देशाचे ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने राज्याचे फार मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया आमदार विजय औटी यांनी दिली.
औटी हे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्ताने मुंबई मुक्कामी असून मुंडे यांच्या निधनाबाबत भावना व्यक्त करताना ते म्हणाले, अलीकडच्या काळात साहेबांसोबत माझी अनेकदा चर्चा झाली. ते राज्यासाठी काय काय करणार होते ते आता केवळ चर्चेपुरतेच राहिले आहे. प्रमोद महाजन, विलासराव देशमुख यांच्या पाठोपाठ गोपीनाथ मुंडे हेही गेल्याने राज्याचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. पारनेरचा कारखाना त्यांनी केवळ माझ्या शब्दाखातर चालविण्यास घेतला. नफ्याचा विचार न करता शेतकरी तसेच कामगारांचे हितच त्यांनी पाहिले. सन २००४ ते २००९ दरम्यान त्यांच्यासमवेत विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावता आल्याचे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2014 रोजी प्रकाशित
मुंडे यांच्या निधनाने मोठी हानी- औटी
देशाचे ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनाने राज्याचे फार मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया आमदार विजय औटी यांनी दिली.

First published on: 04-06-2014 at 03:23 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Large loss mundes demise auti