Marathi News Highlights: राज्याच्या राजकारणात सध्या मोठमोठ्या घटना घडत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, “संधीसाधूपणा करणाऱ्यांना परत स्थान मिळणार नाही, भाजपासोबत गेलेल्यांना आमच्याबरोबर घेणार नाही”. यावर, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “आम्ही केवळ शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जातोय”. दोन्ही प्रमुख नेत्यांच्या वक्तव्यांवर आजही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतील, ज्यावर आपलं लक्ष असेल. तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील जागांबाबत दोन्ही राष्ट्रवादी पक्षातील चर्चा फिस्कटली असून अजित पवारांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. तर, शरद पवारही उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. असं झाल्यास माळेगाव कारखाना निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.
दरम्यान, पूर्व विदर्भामधील शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक आमदाराने केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांवर खासदार श्रीकांत शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून वेगवेगळ्या विभागांमध्ये संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
दुसऱ्या बाजूला पुण्यातील कोंडमळा पूल दुर्घटनेप्रकरणी चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली आहे. तसेच, राज्यातील धोकादायक पूल पाडून तिथे नवे पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह धोकादायक पर्यटस्थळी प्रवेशबंदी करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. तुर्तास तिथल्या परिसरात सूचना फलक लावले जात आहेत. यासह राज्यातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स तुम्हाला इथे वाचायला मिळतील.
Mumbai Maharashtra Breaking News Live Today : राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
"ट्रम्प यांनी जाहीर करावं, मी मध्यस्थीबाबत १७ वेळा केलेलं वक्तव्य मागे घेतो, तरच...", राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला
माझ्या मध्यस्थीमुळे व मी व्यापार बंद करण्याचा इशारा दिल्यामुळे भारत-पाकिस्तान युद्ध थांबलं असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा केलं आहे. त्यावर पंतप्रधान मोदी आज म्हणाले, "आम्ही कोणाच्याही मध्यस्थीमुळे शस्त्रविराम केला नाही". यावर शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, "हेच वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी करावं. ट्रम्प यांनी सांगावं की माझं व मोदींचं बोलणं झालं आहे. यापूर्वी मी १७ वेळा जे वक्तव्य केलं होतं. मी भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केल्याचे अनेक दावे केले होते. ती सगळे वक्तव्ये मी परत घेतो. ट्रम्प असं म्हणाले, तर आम्ही मान्य करू की पंतप्रधान मोदी खरं बोलत आहेत. मोदी सांगतायत की मी ट्रम्प यांना स्पष्ट सांगितलंय, आम्ही आमचा विषय आपसात सोडवलाय. परंतु, त्यांच्यावर विश्वास कोण ठेवणार?"
भाषेचे राजकारण सोडा ...वस्तुस्थिती पहा, भाजपाचा राज ठाकरेंना चिमटा
विरार - अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका…आता भूसंपादनालाही वेग, तर महिन्याभरात नव्याने निविदा...आतापर्यंत ३० टक्केच भूसंपादन
निकषांची पूर्तता न केल्याने राज्यातील ३० वैद्यकीय महाविद्यालयांना एनएमसीचा चाप, नव्याने सुरू झालेल्या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचाही समावेश
मंत्र्यांच्या आश्वासनानंतर बिऱ्हाड मोर्चेकरी माघारी
तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
बीकेसी मेट्रो स्थानकाला गळती; खासदार वर्षा गायकवाड यांची एमएमआरसीसह सरकारवर टीका
भावाच्या गळयावर निर्दयीपणे चाकूचे वर करून हत्या; संशयित अटक
तिसरी भाषा शिकण्यात गैर काय? फडणवीसांचा राज ठाकरेंना सवाल
देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांचा आग्रह आहे की केवळ दोनच भाषा शिकवायला हव्या. तिसरी भाषा लादू नका. मात्र मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केलं आहे. तीन भाषांचं सूत्र अभ्यास करून तयार केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केवळ दोन भाषा शिकवता येणार नाहीत. तमिळनाडू सरकार केंद्राच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली नाही. मला वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याच देशातील एक अधिकची भाषा शिकण्यात वाईट काय. आपल्या राज्यात आपल्या भाषेला डावलेलं नाही. मात्र तिसरी भाषा शिकण्यात गैर काय?
स्वत:च्या उपस्थितीत बडगुजरांचा पक्षप्रवेश मुख्यमंत्र्यांनी टाळला ?
"हिंदीला पर्याय, पण मराठी…", पहिलीपासून तीन भाषा शिकण्याच्या सक्तीबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण
हिंदी शिकणं अनिवार्य नाही : फडणवीस
राज्याच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमधील मुलांना पहिलीपासून तीन भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तत्पूर्वी हिंदी भाषा शिकणं अनिवार्य केलं होतं. यावरून मोठा वाद चालू आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, आपण सुरुवातीला हिंदी भाषा शिकणं अनिवार्य केलं होतं. मात्र, आता आम्ही हिंदी भाषेला पर्याय दिले आहेत.
"देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत", पहिलीपासून तीन भाषा शिकण्याच्या सक्तीबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरेंचा संताप
राज्य सरकारने पहिली ती पाचवीपर्यंतच्या मुलांना तिसरी भाषा शिकणं अनिवार्य केलं आहे. त्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे यांनी आवाज उठवला आहे. राज ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्रावर तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न करू नका. राज्यातील महत्त्वाचे विषय भरकटवण्यासाठी हे सगळं केलं जातंय का? माझी राज्यातील पत्रकारांना, साहित्यिकांना विनंती आहे की त्यांनी या निर्णयाविरोधात कठोर शब्दांत बोलायला हवं. आज हा विषय आपल्यावर लादला गेला तर हे लोक (सरकार) नजिकच्या काळात मराठी भाषेचं अस्तित्त्व ठेवणार नाहीत. आपलं साहित्य संपेल, संस्कृती संपेल. महाराष्ट्र केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली भरडला जाईल. त्यामुळे माझी महाराष्ट्रातील नागरिकांना विनंती आहे की तुम्ही या निर्णयाला विरोध करा. प्रत्येक शाळांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध करावा. तसेच हे सरकार व शाळा हिंदी भाषा कशी शिकवतात तेच मी बघतो. सरकारला हे आव्हान वाटत असेल तर त्यांनी आव्हान म्हणून घ्यावं. मात्र, राज्यात हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार नाही.
सुधाकर बडगुजर यांच्या निमित्ताने भाजपचे नाशिकमध्ये बेरजेचे राजकारण; शिंदे गटालाही शह
"विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे हवी ती तिसरी भाषा शिकवली जाणार, पण…", शिक्षणमंत्र्यांनी सांगितला राज्य सरकारचा निर्णय
ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जाणार नाही त्यांना समज देऊ : शिक्षणमंत्री दादा भुसे
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही. त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न विचारल्यावर दादा भुसे म्हणाले, असं आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही त्या शाळांवर कठोर कारवाई करू. एक-दोनदा समज देऊन पाहू. समज दिल्यानंतरही त्यांनी मराठी भाषा शिकवणं सुरू केली नाही तर त्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल.
राज्यात पुन्हा एकदा ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद, मंत्रिमंडळाची उपसमिती गठित
दक्षिण कोकणचे प्रति महाबळेश्वर आंबोलीत पर्यटन हंगामाला लवकर सुरुवात
एमपीएससीची फसवणूक: खोटे प्रमाणपत्र देऊन बनला अधिकारी, आता कोट्यवधी रुपयांचा…
कुंडमाळा दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग प्रशासन खडबडून जागे, ४०६ साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, ३३ कोटींचा निधी आवश्यक
तिसरी भाषा अनिवार्यच; शिक्षणमंत्र्यांनी फसवणूक केल्याची टीका
वांद्र्यात मोठी दुर्घटना, निर्माणाधीन इमारतीची भिंत शेजारच्या घरावर कोसळली, दोन जण गंभीर जखमी

वांद्रे पूर्व येथील इंदिरा कृपा हाउसिंग सोसायटी या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीची भिंत शेजारच्या चाळीतील एका घरावर कोसळली. या दुर्घटनेत दोनजण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. (छायाचित्र - दीपक जोशी)
पावसाळ्यात राज्यावर वीज संकट, विद्युत कंपनीत भाड्याच्या वाहनांच्या दरामुळे…
हिंदी अनिवार्य नाही; पण तृतीय भाषेलाही स्थगिती नाही! राज्य सरकारचा निर्णय
राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा स्थगित करण्याची शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलेली घोषणा हवेत विरली आहे. शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकानुसार, राज्यातील राज्य मंडळाशी संलग्न मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषेसाठी भारतीय भाषांचा पर्याय शिक्षण विभागाने दिला आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आज सकाळी ११.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. राज या पत्रकार परिषदेत कोणते मुद्दे मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा शिकण्याची सक्ती, एअर इंडियाच्या विमानाचा अपघात की शिवसेनेबरोबरची (ठाकरे) युती यापैकी कोणत्या विषयावर राज त्यांचे मुद्दे मांडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.