Maharashtra News : राज्यात एकीकडे शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय नेमका काय निकाल देणार, याची उत्सुकता असताना दुसरीकडे दसरा मेळाव्यावरून राजकारण रंगू लागलं आहे. आम्हीच खरी शिवसेना असं म्हणत शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर देखील हक्क सांगणाऱ्या शिंदे गटाकडून आता दसरा मेळावा आमचाच होणार, असा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेकडून देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा आमचाच होणार अशी भूमिका मांडली जात आहे. मात्र, या दोघांवर टीका करत मनसेकडून मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा महत्त्वाचा असल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात मनसेकडून शिवसेना आणि शिंदे गट या दोघांना खोचक शब्दांत टोला लगावण्यात आला आहे. म्हाडा सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेतच बदल करण्यात येणार आहे. त्यानुसार यापुढे सोडतीची पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल. इच्छुकांना अर्ज भरतानाच आवश्यक ती सर्व कागदपत्रे ऑनलाइन जमा करावी लागणार आहेत. त्याशिवाय अर्ज भरताच येणार नाही. कागदपत्रांच्या छाननीत पात्र ठरणारेच सोडतीत समाविष्ट होऊ शकतील. महत्त्वाचे म्हणजे पात्रता आधीच निश्चित झाल्याने विजेत्यांना थेट देकार पत्र देण्यात येणार आहे. सोडत प्रक्रियेत अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि नव्या पद्धतीमुळे सोडत १०० टक्के पारदर्शक होईल, दावा करण्यात येत आहे. यासंबंधीचा प्रस्ताव मुंबई मंडळाने म्हाडा प्राधिकरणाला सादर केला आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत असणार आहे. याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…