Maharashtra News Highlights: मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, धाराशिव, अकोला व रायगडसह राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः झोडपलं आहे. या पावसामुळे पुणे-बंगळुरू महामार्गाला नदीचं स्वरुप आलं आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील अनेक घरांचं नुकसान झालं आहे. तर, वादळी वाऱ्याचा पिकांनाही मोठा फटका बसला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस राज्याला मान्सूनपूर्व पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई व ठाण्याला यल्लो अलर्ट तर पुणे व कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सांगलीलाही यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. पावसाच्या बातम्यांवर आपलं लक्ष असेल.
दरम्यान, करोनाने मुंबईकरांची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात बुधवारी करोनाचे २६ रुग्ण आळढले असून एकूण रुग्णसंख्या १३२ वर पोहोचली आहे. राज्यात सर्वाधिक २५ रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केलं आहे. दुसऱ्या बाजूला पुण्यातील वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. यासह राजकीय घडामोडींवरही आपलं लक्ष असेल.
Mumbai Maharashtra News Live Today : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्या एकाच क्लिकवर.
Vaishnavi Hagawane Case: अजित पवारांचा वैष्णवीच्या वडिलांना फोन; धीर देताना म्हणाले, "मुलीला नांदवायचे नव्हते तर…"
मंत्रालयात पेशवाईसारखे वातावरण; धुळ्यातील घटनेवरून बच्चू कडू यांची टीका
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर आमदार रोहित पवारांचं भाष्य
मुलीच्या बापाने दिलेल्या हुंड्याच्या जीवावर जगणारी जमात ही स्वतःमध्ये हिंमत नसलेले षंढ, बांडगुळ आणि एक नंबरचे भिकारी असतात. हुंडा मागणाऱ्याला हुंडा तर नाहीच पण यापुढं कोणत्याही आई-वडीलांनी आपली मुलगीही दिली नाही पाहिजे. तसंच ‘हुंडामुक्त महाराष्ट्र’ ही राज्य सरकारने सुरु केलेली मोहिम थंडावली असून ती पुन्हा अधिक जोमाने राबवून लोकांपर्यंत पोचवली तर भविष्यात अनेक ‘वैष्णवीं’चा जीव वाचेल…
कल्याणमधील इमारत दुर्घटनेतील रहिवाशांची पुनर्वसनाची मागणी
आंबोली घाट रस्त्यावर दरड कोसळली;वाहतूक कोंडी, बांधकाम विभागाने रस्ता केला पुर्ववत
नाशिक : जिल्हा आरोग्य विभागास नव्याने १९ रुग्णवाहिका, एचएएलची सामाजिक दायित्व निधीतून मदत
"भविष्यात असा निर्घृणपणा करण्याचं कोणाचं धाडस होऊ नये यासाठी...", वैष्णवी हगवणेच्या पालकांना भेटल्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज मयत वैष्णवी हगवणे हिच्या पालकांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी सामंत म्हणाले, "हा नीचपणाचा कळस आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोन जण फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची सहा पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढच्या २४ तासांत उरलेले दोन आरोपी गजाआड दिसतील. पोलिसांना त्या आरोपींना पकडण्यात यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. भविष्यात असा निर्घृणपणा, नीचपणा करण्याची कोणाची हिंमत होणार नाही अशी शिक्षा आरोपींना व्हायला हवी. यासाठी पोलिसांनी पुरावे गोळा करून खटला चालू करावा अशा सूचना पोलिसांना करण्यात आल्या आहेत".
युतीसाठी राज व उद्धव ठाकरे थेट चर्चा करणार? राऊत म्हणाले, "आम्हाला स्पष्ट सांगितलंय…"
जून महिन्यात येणाऱ्या रानभाज्या, मे महिन्यातच अवकाळी पावसामुळे विक्रीसाठी आल्या बाजारात
ठाण्यात सुरक्षा भिंत रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या तीन वाहनांवर कोसळली
मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास महाग, सोमवारपासून २५ रुपये दरवाढ
महावितरणकडून पावसाळ्यापूर्वी वीजसमस्यांवर उपाययोजना; वृक्ष छाटणी यासह विविध तांत्रिक दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर
धुळ्यातील विश्रामगृहात सापडलेल्या रकमेबाबत आमदार अर्जुन खोतकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "माझे पीए..."
धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रकमेच्या घटनेवर अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अनिल गोटे व संजय राऊत यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच ते म्हणाले हा विरोधकांचा डाव आहे. माजे स्वीय सहाय्यक त्या रूममध्ये राहत नव्हते. तो बाजूच्या रूममध्ये राहत होते. माजी आमदार अनिल गोटे यांची आरोप करण्याची जुनी सवय आहे. सरकारला, अंदाज समितीला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे.
राहाता : बहीण-भावाचा तलावात बुडून मृत्यू, आठवड्यात दुसरी घटना
अहिल्यानगर : कोल्हार परिसरात महिन्यात ४ बिबटे जेरबंद
'ऑपरेशन सिंदूर'मधून आत्मनिर्भर भारताचे दर्शन - राधाकृष्ण विखे
चौंडीतील अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती महोत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेमुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण; मार्ग सुकर, प्रवाशांना दिलासा
रांजणपाडा गावासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज
“आम्ही प्रतिसाद दिला, आता राज ठाकरे…”, मनसे-ठाकरे गटाच्या युतीवर अनिल परबांचं सूचक वक्तव्य
शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब म्हणाले, "शिवसेना (उबाठा) राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करण्यासाठी सकारात्मक आहे. आम्ही तसा प्रतिसाद राज ठाकरे यांना दिला आहे. आता राज ठाकरे यांनी ठरवाचं आहे की कोणाशी युती करायची आणि कोणाशी युती करू नये. त्यांनी महाराष्ट्राचा विचार करून निर्णय घ्यावा".