सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेली चितळे समिती अमान्य असल्याचे सांगत खासदार गोपीनाथ मुंडे यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना मंत्रिमंडळातून बाजूला करून स्वतंत्रपणे कारवाई करावी, अशी मागणी केली. सिंचन घोटाळा प्रकरणात चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, असेही ते म्हणाले. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असली तरी त्यांना घालून दिलेल्या कार्यकक्षेमुळे या समितीच्या अहवालातून काहीही हाती लागणार नाही. सिंचन प्रकल्प कसे उभारावेत आणि पाण्याच्या अनुषंगाने काय धोरण असावे, असे मार्गदर्शन होईल.
मात्र, सिंचन विभागातील भ्रष्टाचारावर ठोस कारवाई होणार नाही. त्यामुळे चितळे समिती अमान्य असल्याचे मुंडे म्हणाले. चितळे यांच्या नावाला विरोध नाही. ते जलतज्ज्ञ आहेत, मात्र आक्षेप कार्यकक्षेचा आहे. ज्या संदर्भाने त्यांना काम करायला सांगितले आहे, तो मुद्दाच नाही. त्यामुळे मंत्र्यांना दूर ठेवून विद्यमान न्यायाधीशासह पोलीस अधिकाऱ्यांचा समितीत समावेश असावा, अशी भाजपची मागणी असल्याचे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2013 रोजी प्रकाशित
मुंडेंना चितळे समिती अमान्य
सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेली चितळे समिती अमान्य असल्याचे सांगत खासदार गोपीनाथ मुंडे यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना मंत्रिमंडळातून बाजूला करून स्वतंत्रपणे कारवाई करावी, अशी मागणी केली.
First published on: 02-01-2013 at 04:53 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Munde opposed to chitle committee