लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : तुतारी असणारी राष्ट्रवादी संपत चालली आहे अशी टीका करीत बारामतीतील महायुतीचा विजय हा राज्यातील सर्वात मोठा विजय ठरेल असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी इस्लामपूर येथे केले. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या पुढाकाराने आज शेतकरी, कामगार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस महायुतील घटक पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

What Supriya Sule Said About Rohit Pawar ?
Supriya Sule : “रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शरद पवारांचा वारसा..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Ratnagiri assembly constituency marathi news
Ratnagiri Assembly Constituency: उदय सामंत सलग पाचव्यांदा गड राखणार? महाविकास आघाडीकडून कोणाला मिळणार उमेदवारी?
What Supriya Sule Said?
Supriya Sule : “देवेंद्र फडणवीस यांचं हातात बंदूक घेतलेलं पोस्टर, ही मिर्झापूर सीरिज..” सुप्रिया सुळेंचा सवाल
Due to lack of trust in Devendra Fadnavis and Chandrashekhar Bawankule department wise meetings of party leaders says Jayant Patil
फडणवीस, बावनकुळेंवर विश्वास नसल्याने दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या विभागनिहाय बैठका, जयंत पाटील यांचा चिमटा
Bhoomipujan of Bhidewada National Memorial by pm Modi Criticism of Sharadchandra Pawar NCP Party
भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची टीका
Anil Deshmukh On Akshay Shinde Encounter
Anil Deshmukh : “हातात बेड्या असलेला आरोपी पोलिसांचे पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो?”, अनिल देशमुखांचा सवाल
Congress national in-charge Ramesh Chennithala said Now only one target to change Maharashtra power
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी चेन्नीथला म्हणाले, “आता एकच लक्ष्य, महाराष्ट्र सत्ताबदल”

यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना श्री. बावनकुळे म्हणाले, तुतारी चिन्ह असणाऱ्या राष्ट्रवादीतुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दररोज पक्षप्रवेश होत आहेत. त्यामुळे तुतारी असणारी राष्ट्रवादी संपत चालली आहे. पण त्यांना चिन्ह मिळाले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र ही निवडणूक मोदी गॅरेंटीवर होणार आहे.

आणखी वाचा-सोलापूर : चहासाठी रेल्वेतून खाली उतरणे सराफाला पडले महागात

बारामती लोकसभा मतदार संघातल्या स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, बारामती मध्ये अजित पवार जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल आणि त्या उमेदवाराला ६० टक्के पेक्षा जास्त मते मिळतील, आणि बारामतीचा विजय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा विजय ठरेल. लोकसभा जागाबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि केंद्रीय नेतृत्व बैठक घेऊन ठरवेल. जागा ठरल्यानंतर त्या निवडून आणण्याचा प्रयत्न महायुतीचे सगळे पक्ष करतील असेही ते म्हणाले.