छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते. ते स्वराज्यरक्षक होते, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. पवारांच्या याच विधानाचा भाजपा आणि शिंदे गटाने विरोध केला आहे. अजित पवार यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी केले आहे. त्यानंतर आता भाजपाचे नेते नितेश राणे यांनीदेखील अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार यांचा धरणवीर असा उल्लेख करत नितेश राणे यांनी अजित पवार यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

हेही वाचा >> ‘अजित पवार २४ तासांत माफी मागा,’ तुषार भोसलेंच्या मागणीवर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया; म्हणाले, “जागा अन् वेळ…”

“आम्ही हिंदवी स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराजांना धर्मवीरच म्हणणार. धरणवीर असणाऱ्यांना धर्मवीर ही पदवी कधीच कळणार नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिले. इस्लामसमोर न झुकता औरंगजेबाला आपली जागा दाखवली. त्यांनी हिंदू धर्माचे वेगवेगळे ग्रंथ लिहिले. हे राष्ट्रवादी आणि पवारांना कधीच समजणार नाही,” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

हेही वाचा >> अब्दुल सत्तारांच्या स्वपक्षीय नेत्यांवर आरोप, रोख नेमका कोणाकडे? संदिपान भुमरे म्हणाले “याबाबत…”

“महाराष्ट्राच्या विरोधीपक्षपदावर ठपका लागला आहे. त्यामुळे जास्त वेळ न घालवता थोडीजरी लाज राहिली असेल तर अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणीही नितेश राणे यांनी केली.

हेही वाचा >> “सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट…”, जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक ट्वीट

अजित पवार काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभेत बोलत असताना अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी भाष्य केले होते. “महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती.