सातारा : जिल्ह्यात मे महिन्यात महाबळेश्वरपेक्षाही दुष्काळी फलटण तालुक्यात सर्वाधिक ३६५.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये २९१.२ मि.मी. तर कोरेगाव तालुक्यात ३२९.७ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यातील सर्व अकरा जिल्ह्यात नऊ दिवसांत सरासरी २८९ मि.मी.ची नोंद झाली.

पावसाने फलटण तालुक्यात शेती पिकांचे सर्वांत जास्त नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करायचे काम सुरू करण्यात आले आहे. शेतात पावसाचे पाणी साठवून शेती वाहून गेली. केळी, कोबी फ्लावर पेरूच्या बागांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नेहमी पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजाला आता याच पावसामुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला यांसह फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला आहे.

शेती पिकांशिवाय सातारा तालुक्यातील ९० पोती कांद्याची नासधूस झाली आहे. सातारा शहरातील गोडोलीमधील काही दुकानात पाणी शिरल्याने व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे. कोरेगाव तालुक्यातील विहिरीचे दगडी बांधकाम कोसळून नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. सध्या पावसाची उघडझाप सुरू असली तरी आणखी पावसाची शक्यता असल्याने ग्रामीण भाग धास्तावला आहे. पावसामुळे खरीप हंगाम लांबणीवर पडला आहे. खरिपाच्या लगवडीवर ही परिणाम झाला आहे. एकूणच या पावसाने शेती पिके, भाजीपाला, फळे यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

Phaltan in Satara, Phaltan rain , Satara latest news,
फलटण तालुक्यात पेरूच्या बागांचे नुकसान झाले आहे.

पावसामुळे शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांवर मोठे संकट कोसळले असले तरी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. बाधितांना तातडीची मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पावसाचे संकट हे नैसर्गिक असले तरी, त्याचा परिणाम मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठवडाभरातील पावसाने दुष्काळी माण व खटाव तालुक्यातील ओढे, नाले तलाव भरून वाहू लागले आहेत. राणंद तलावातील सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने येथील पूल पाण्याखाली गेला आहे. रविवारपासून वाहतूक बंद असल्याने दहिवडीला जाण्याचा मार्ग बंद झाला असून, पाणी कधी ओसरणार, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहिले. शेतीचे बांध वाहून गेले. शेती वाहून गेली आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. पाऊस ओसरला पण पूर परिस्थिती कायम आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे, असे कृषी विभागाने सांगितले.