पक्षांतर बंदी झाली की नाही, हा निर्णय आदित्य ठाकरे घ्यायचा नाही. तर, हा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे, असा टोला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. विधिमंडळात संख्याबळ नसेल, तरच सरकार कोसळेल, असेही राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं. ते सिंधुदुर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राहुल नार्वेकर म्हणाले, “सरकार पडणार की नाही, हे सभागृहातील बहुमतावर अवलंबून आहे. कुणाच्याही भविष्यवाणीकडे पाहण्याची मला आवश्यकता नाही. कारण, संविधानात सरकार पडणे आणि टिकण्याबद्दल तरतुदी आहेत. संख्याबळ असेल, तर सरकार टिकते. विधिमंडळात संख्याबळ नसेल, तरच सरकार कोसळेल.”

Vijay Wadettiwar warning to the Grand Alliance regarding Manoj Jarange Mumbai
उगाच विरोधकांवर खापर फोडू नका; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला इशारा
Sharad pawar on Ajit pawar Baramati Lok Sabha result
Sharad Pawar on Ajit Pawar : ‘अजित पवारांनी विकास कामं केली तरी लोकांनी सुनेत्रा पवारांना का नाकारलं?’, शरद पवार म्हणाले, “शेवटी ती बारामती…”
jitendra awhad latest news
“शिंदे सरकारने आजपर्यंत मला एक रुपयांचा निधी दिला नाही”, जितेंद्र आव्हाडांचा आरोप; म्हणाले, “मी अजित पवारांच्या…”
shankaracharya swami avimukteshwaranand saraswati on rahul gandhi hindu statement
Video: “जेव्हा आम्हाला राहुल गांधींच्या हिंदूंबाबतच्या विधानाबद्दल सांगण्यात आलं, तेव्हा…”, शंकराचार्यांचं मोठं विधान!
ajit pawar speech
Video: अजित पवारांचं उत्तर वडेट्टीवारांना, पण रोख शरद पवारांवर? अर्थसंकल्प फुटल्याचा केला होता आरोप; म्हणाले, “मी स्पष्टच सांगतो…”
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
amol kolhe
“केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं”, लोकसभेतील पहिल्याच भाषणात अमोल कोल्हेंची मागणी; म्हणाले…
Devendra Fadnavis and bhaskar jadhav
भास्कर जाधवांनी सभागृहात वाचून दाखवला व्हॉट्सअप मेसेज; फेक नरेटिव्हचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, “मी आता…”

“…हे संविधानाने दिलेल्या तरतुदीच्या विरोधात आहे”

“हे सरकार संविधानाच्या तरतुदीनुसार निवडून आलं आहे. सरकारने बहुमत सिद्ध केलं आहे. सरकार पडेल, अशी भविष्यवाणी करणं, हे संविधानाने दिलेल्या तरतुदीच्या विरोधात आहे,” असंही नार्वेकरांनी सांगितलं.

“…तर उचित कारवाई करेन”

“पक्षांतर बंदी झाली का नाही, हा निर्णय आदित्य ठाकरेंना घ्यायचा नाही. हा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. त्यामुळे मी विधानसभा अध्यक्ष असल्याने सर्व नियम, संवैधानिक आणि १० व्या अनुसूचीनुसार तरतुदींचं पालन करून अपात्रतेचा निर्णय घेणार आहे. कुठेही पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन झाले असेल, तर उचित कारवाई करेन,” असं राहुल नार्वेकरांनी म्हटलं.