सध्या राज्यात ९ हजार सक्रिय करोना रुग्ण असून आहेत. तिसऱ्या लाटेतील करोना बाधितांची दररोजची संख्या ही ४८ हजारापर्यंत गेली होती. परंतु आता राज्यातील करोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून हा चिंतेचा विषय नक्कीच नाही. त्यामुळे ही तिसरी लाट संपली, असं माझं वैयक्तिक मत आहे. असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे परीणाम भोगले, त्यामुळे राज्यातील कोरोना एकदम संपला आहे अशी भूमिका घेऊन चालणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. सध्या आपण निर्बंध मुक्तीकडे वाटचाल करत आहोत. मात्र, मास्कमुक्तीचा निर्णय घेताना घाईगडबड चालणार नाही. हा निर्णय विचार करूनच घ्यावा लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajesh tope speaks about covid third wave and maks in jalna hrc
First published on: 27-02-2022 at 16:38 IST