कोल्हापूर जिल्ह्यातील रत्नागिरी महामार्गावर केरली येथे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. केरली जवळ रस्ता ५० फूट खचला असल्याने जोतिबाकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. करवीर पोलीस ठाणे हद्दीतुन जाणारा कोल्हापुर ते रत्नागिरी या राज्य मार्गावर रेडेडोह येथे पाणी आले असून सीपीआर चौकात बॅरेकेटींग लावुन वाहतुक बंद करून वळवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच केरली फाटा येथेही बॅरेकेट उभारून वाहतुक वळवण्यात आलेली आहे. याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यास वाहतुक वळविणबाबत कळवले आहे. रात्रीसाठी योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road closed for traffic due to water msr
First published on: 31-07-2019 at 23:11 IST