माजी खासदार संभाजीराजे यांनी आज उस्मानाबाद दौऱ्यावर असताना एका आरोग्य केंद्राची पाहणी केली. यावेळी या केंद्राची दुरावस्था बघून संभाजीराजे चांगलेच संतापले. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्याच मतदारसंघातील आरोग्य केंद्राची वाईट अवस्था बघून त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं.

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयात घमासान, एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ पत्राचा संदर्भ देत ठाकरे गटाकडून शिंदे गटाची कोंडी

udayanraje bhosale, nomination, satara lok sabha 2024 election
मला उमेदवारी मिळणार हे निश्चित – उदयनराजे
mahayuti, candidate, aurangabad constituency, lok sabha election 2024, Eknath shinde
महायुतीत औरंगाबादच्या उमेदवारीचा तिढा कायम
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
latur lok sabha marathi news, shivraj patil chakurkar latur latest news in marathi
शिवराज पाटील यांच्या ‘देवघरा’ बाहेरील गर्दी वाढली

काय म्हणाले संभाजीराजे?

राज्यातील आरोग्यकेंद्रे जर सुसज्य होणार नसतील, तर आम्ही वेळोवेळी आंदोलनं करू. याच उद्देशाने आम्ही स्वराज्य संघटनेची स्थापना केली आहे. माझी राज्य सरकारला इशारा देतो, की त्यांनी लवकरात लवकर या आरोग्य केंद्रांची सुधारणा करावी. आरोग्य केंद्र हे सामान्य माणसाच्या हक्काचं आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली. सर्वच राजकीय नेते शिवाजी महाराजांचा नाव घेऊन राजकारण करतात. मग त्यांचे विचार आचरणात का आणत नाही? शिवाजी महाराजांच्या राज्यात अशी वाईट अवस्था राहिली असती का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – शिंदे गटाच्या व्हिपमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन? कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले, “याचा अर्थ…”

संभाजीराजेंकडून आरोग्य केंद्राची पाहणी

आज या आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कमी आहे. येथील कॉप्युटर धूळ खात पडले आहेत. बाथरूमध्ये साधं पाणीदेखील नाही. आरोग्य केंद्राच्या मागे डॉक्टरांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. मात्र, तिथे कोणीही राहत नाहीत. त्याठिकाणी डुकरं जमा झाली आहेत, हे सर्व आम्ही कॅमेरात रेकॉर्ड करून ठेवलं आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “१०० सोडा, मी शिंदेना पाच फोन जरी केले असतील तर…”; मोहित कंबोज यांच्या आरोपानंतर भास्कर जाधव आक्रमक!

आधी आरोग्य खात्यातील भरती करा

राज्य सरकारने भरतीसंदर्भात मोठा गाजावाजा केला. मात्र, सरकारला भरती करायची असेल तर आधी आरोग्य खात्यातील भरती करावी. याची सर्वात जास्त आवश्यकता आहे. आम्ही आज आरोग्य केंद्राची पाहणी करताना सर्व व्हिडीओ रेकॉर्डींग केली आहे. तसेच मी यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.