औरंगाबादचे शिवसेनेचे(ठाकरे गट) माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांचे पुत्र माजी नगरसेवक आणि युवासेनेचे पदाधिकारी ऋषिकेश खैरे हे एका ऑडिओ क्लिप प्रकरणावरून वादात सापडले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदली करून देण्यासाठी एक व्यक्तीकडून त्यांनी दोन लाख रुपये घेतल्याचे या ऑडिओ क्लिपमधून उघड होत आहे. मात्र संबंधित व्यक्तीचे काम न झाल्याने तो व्यक्ती आता ऋषिकेश खैरेंकडे पैसे परत करण्याची मागणी करत आहे. या प्रकरणावरून आता भाजपा आणि शिंदे गटाने चंद्रकांत खैरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका सुरू केली आहे. शिंदे गटाचे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी खैरे पिता-पुत्रावर टीका केली आहे.

“एखाद्या कार्यकर्त्यांनी जर चार चाकी वाहन घेतले किंवा चांगले मोठे घर घेतलं तर त्याच्याकडे संशयाने पाहणारे चंद्रकांत खैरे आता यावर काय उत्तर देतील?” असा सवाल शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे.

narendra modi marathi news, narendra modi lok sabha marathi news
नरेंद्र मोदी एवढे चिंतातूर का झाले आहेत?
thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
Pm narendra modi on ram mandir nirman
‘देशात राम मंदिर झाले पण आग लागली नाही’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी का म्हणाले? वाचा
jitendra awhad marathi news, jitendra awhad latest news in marathi
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “भाजपची जादू संपलेली आहे”

हेही वाचा – वाझे ते खैरे व्हाया अनिल देशमुख हीच खरी महाविकास आघाडी सरकारची ओळख – भाजपाचे टीकास्त्र!

याशिवाय, “यावरून एक गोष्ट लक्षात आली जे आडात आहे तेच पोहऱ्यात आले. युवा सैनिक घडवण्याची जबाबदारी असणारा पदाधिकारी खऱ्या अर्थाने युवकांना काय आदर्श देणार? हा एक चर्चेचा विषय ठरतो.” असंही राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलं आहे.

भाजपानेही केली आहे टीका –

“वाझे ते खैरे हीच खरी महाविकास आघाडीची ओळख आहे. सचिन वाझेंपासून चंद्रकांत खैरेंच्या मुलापर्यंत ज्या पद्धतीने पैशांची लुटालुट या राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली, त्यावरून महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका अर्थाने वसुलीचं सरकार होतं, हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे.” अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे