योगगुरू रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वी महिलांच्या कपड्यावरून आक्षेपार्ह विधान केलं होतं. महिलांनी कपडे परिधान केले नाही, तरीही त्या चांगल्या दिसतात,असं विधान रामदेव बाबांनी केलं होतं. यावेळी मंचावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. याच प्रकारावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच रामदेव बाबांवर विनयभंगाचा गुन्हा का दाखल झाला नाही? असा सवालही अंधारेंनी उपस्थित केला. त्या बीड येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलत होत्या.

यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, “महिलांनी कपडे परिधान केले नाही, तरीही त्या चांगल्या दिसतात, हे विधान अतिशय गंभीर असून यावर एकानेही आक्षेप घेतला नाही. रामदेव बाबांवर गुन्हा दाखल केला जात नाही, हा किती गलिच्छपणा आहे. खरं तर, तिथे विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. कारण भारतीय संविधानातील कलम ३५४ नुसार, विनयभंगाची संज्ञा अशी सांगते की, जिथे एखादं उच्चारण, वाक्य, कृती, उक्ती किंवा घटनेमुळे महिलांना लज्जा किंवा संकोच उत्पन्न करते, तिथे विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो.”

हेही वाचा- “नंगटपणा हा…”, अमृता फडणवीसांचा स्विमिंग पूलमधील फोटो शेअर करत अंधारेंचा चित्रा वाघ यांना सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आता रामदेव बाबांनी म्हटलं की, महिलांनी कपडे घातले नाही, तरीही ती चांगली दिसते. हे विधान आम्हाला (महिलांना) संकोच निर्माण करणारं आहे. आमच्या स्त्री सुलभतेला लज्जा उत्पन्न करणारं आहे. रामदेव बाबांशेजारी मंचावर या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी उपस्थित होत्या. त्यांनीही यावर आक्षेप घेतला नाही. पण त्यानंतर जावेद नावाच्या कोणत्या तरी व्यक्तीवर एवढी चर्चा का होते?” असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला.