तालुक्यातील पेडगाव येथे जि. प. शाळेवरील टिनपत्रे वादळी वा-याने उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांवर छताविनाच शिक्षण घेण्याची वेळ ओढवली आहे. शाळा खोलीची दुरुस्ती करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी केली आहे.
जिल्ह्यात ३ दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन शेतकरीवर्गाचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले रब्बी पीक मातीला मिळाले. प्रशासनाची नुकसानीच्या पंचनाम्याची लगबग सुरू आहे. पेडगाव येथील शाळेवरील टिनपत्रे उडून गेल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. शिवाय शाळेच्या िभतीचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे शाळेचे सुमारे ३ लाखांवर नुकसान झाले.
या शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यास जागाही नाही. त्यामुळे बाहेर व्हरांडय़ात बसून उघडय़ावर शिक्षणाचे धडे घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजकुमार ठाकूर यांनी शाळेच्या नुकसानीचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला. यात शाळेची एक खोली मतदान केंद्रासाठी दिली होती. त्यामुळे शाळा खोलीची तातडीने दुरुस्ती व्हावी, असे अहवालात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2014 रोजी प्रकाशित
छताविना विद्यार्थ्यांचे उघडय़ावरच शिक्षण!
तालुक्यातील पेडगाव येथे जि. प. शाळेवरील टिनपत्रे वादळी वा-याने उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांवर छताविनाच शिक्षण घेण्याची वेळ ओढवली आहे. शाळा खोलीची दुरुस्ती करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी केली आहे.
First published on: 13-03-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students education without a roof due to rain damage