ऑटोरिक्षाला ट्रॅक्टरची धडक बसून तीनजण जागीच ठार, तर अन्य पाचजण जखमी झाले. औंढा नागनाथ ते हट्टा रस्त्यावरील बाराशीव शिवारात गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला.  हट्टा पोलिसात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली. औंढा तालुक्यातील वगरवाडी तांडा येथील लोक टाटा मॅजिक ऑटोमधून जात होते. बाराशीव शिवारात समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने (एमएच ३८ डी २११७) ऑटोला समोरून धडक दिली. त्यात कमलाबाई साहेबराव चव्हाण (वय ४०), बाबूराव रामदास चव्हाण (वय ५०) व वसंत रूपसिंग चव्हाण (वय ३२) (सर्व वगरवाडी तांडा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर बाबू गोपा राठोड, विनोद बाजीराव चव्हाण, रोहिदास गंगाधर चव्हाण व रामराव धनुसिंग हे पाचजण जखमी झाले. जखमींना रात्रीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बाबू गोपा राठोड याच्या फिर्यादीवरून वाहनचालक गोदागिरी देवगिरी जवळाबाजार याला अटक केली. घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्यातील जमादार पोटे, त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. जखमींना जवळा बाजारच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.