धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी अलीकडेच साईबाबांविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला आहे. साईबाबा हे संत होऊ शकतात, ते फकीर होऊ शकतात पण ते देव होऊ शकत नाहीत, असं विधान धीरेंद्र शास्त्री यांनी केलं. “गिधाडाचं चामडं पांघरून कुणी सिंह होत नाही”, असंही धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या साईबाबांवरील वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देऊन धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानाचा निषेध केला आहे. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनीही धीरेंद्र शास्त्रींवर टीकास्र सोडलं असून त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देसाई यांनी केली. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही टीका केली.

Amit Shah claims that there is no encroachment of even an inch by China
चीनकडून एका इंचावरही अतिक्रमण नाही; अमित शहा यांचा दावा; पहिले पंतप्रधान नेहरूंवर टीकास्त्र
Prime Minister Narendra Modi criticism of the India front as rumors about CAA by the opposition
‘सीएए’बाबत विरोधकांकडून अफवा; पंतप्रधान मोदी यांचे ‘इंडिया’ आघाडीवर टीकास्त्र
Narendra Modi and Jawaharlal Nehru
Video: मोदी सरकार उद्योगपतींचं? आरोपांबाबत विचारणा करताच मोदींनी दिला नेहरूंच्या कार्यकाळाचा संदर्भ; म्हणाले…
FIR registered, Dhirendra Shastri Bageshwar Baba, mohadi police station, bhandara district, controversial statement
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबांना आक्षेपार्ह विधान भोवले, गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण….

संबंधित व्हिडीओत तृप्ती देसाई म्हणाल्या, “धीरेंद्र शास्त्रीजी, साईबाबा हे कोट्यवधी भक्तांसाठी देवच आहेत. तुमचा सनातन धर्म कोणता आहे? आणि तो साईबाबांना देव का मानत नाही? हे मला माहीत नाही. परंतु जे लाखो भक्त साईबाबांना देव मानतात, त्यांची श्रद्धा दुखावली आहे. तुम्ही त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.”

हेही वाचा- रोहित पवारांकडून बागेश्वर बाबा आणि कालीचरण महाराजांच्या वक्तव्यांचा समाचार; म्हणाले, “भोंदूंच्या खांद्यावर बंदूक…”

“ते साईबाबांना देव मानत नसतील तर धीरेंद्र शास्त्रींना महाराज म्हणायची काहीच गरज नाही. ते आधीच जोकरसारख्या टाळ्या वाजवत असतात. मध्येच हसत असतात. पण आम्ही तुम्हाला जोकर म्हणणार नाही. कारण आमचा धर्म आम्हाला असं काही शिकवत नाही. आम्ही माणुसकी हाच धर्म मानतो. तो धर्म आम्हाला कुणाच्यात भेदभाव करायला शिकवत नाही. त्यामुळे तुम्ही तातडीने साईभक्तांची माफी मागितली पाहिजे. धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे” असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.