अवघ्या काही दिवसांपूर्वीच रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्माण झालेल्या दंगलसदृश्य स्थितीमुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटताना पाहायला मिळाले. आता अहमदनगरमध्ये मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली आहे. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत करण्याचे प्रयत्न सुरू केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

अहमदनगरच्या गजराजनगर परिसरात हा सगळा प्रकार घडला. इथल्या वारुळवाडी रस्त्यावर दोन गटांमध्ये काही कारणावरून बाचाबाची सुरू झाली. लवकरच या वादाचं रुपांतर तुफान दगडफेकीमध्ये झालं. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा सगळा राडा सुरू झाला. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी परिसरात उभ्या असलेल्या दोन मोटारसायकल जालून टाकल्या तसेच, बाजूला उभ्या असलेल्या स्विफ्ट कारचीही तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two group clashes in ahmednagar police action to control pmw
First published on: 05-04-2023 at 10:41 IST