Sharad Pawar in Markadwadi : माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यासह इतरही १०० हून अधिक ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्ष ईव्हीएमविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार मारकडवाडीत पोहोचले असून त्यांनी तिथून लाँग मार्चला सुरुवात केली. मारकडवाडीत शरद पवारांनी ग्रामस्थांना संबोधन केलं. तसंच, शरद पवारांसमोरच उपस्थित महिलांनी शासनाविरोधात एल्गार पुकारला. काही महिलांनी उत्स्फूर्त भाषणं करून शासनाला कोंडीत पकडलं आहे.

एक महिला म्हणाली, “आमचं मतदान व्हायचं होतं ते झालं नाही. आमच्यावर शासनाने अन्याय केला. बॅलेट पेपरवर मतदानही करू दिलं नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला. पोलिसांनी दमदाटी करून गुन्हा दाखल करू असं पोलीस म्हणत होते. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा >> उत्तम जानकर यांच्यावर मारकडवाडी प्रकरणी गुन्हा

लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून…

दुसऱ्या महिलेने कवितेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा गजर करत ईव्हीएमविरोधात न्याय मागितला. “लाडक्या बहिणीचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्येचा अपमान करत आहात. तुम्ही स्वःच्या हिमतीवर अनेकांना जगवलं होतं”, असं म्हणत सदर महिला पुढे म्हणाली, “मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीच्या देशभर पेटला पाहिजे.”

फक्त महिलाच नव्हे तर शाळकरी मुलीनेही ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला. ती म्हणाले, “आमच्या आमदारसाहेबांना जास्त लीड मिळायचं. पण यंदा मिळालं नाही. त्यामुळे या शकंचे निरसन व्हावं म्हणून बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी केली. पण, आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान करू दिलं नाही. हा आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे, ईव्हीएम हटवा, आणि देश वाचवा.”

हेही वाचा >> Sharad Pawar : मी काय चुकीचं केलं? मारकडवाडीतील ग्रामस्थांसमोरच शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल

मारकडवाडीत जाऊन शरद पवार काय म्हणाले?

ईव्हीएम विरोधात आंदोनल उभारणाऱ्या मारकडवाडीच्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी आज राष्ट्रवादीने (शरद पवार) कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शरद पवार म्हणाले, “आज जगात कुठेही ईव्हीएमचा वापर होत नाही. मग भारताच याचा वापर का सुरू आहे. आज तुमच्या गावाने एका वेगळ्या पद्धतीने जायचे ठरवले तर सरकाने तुमच्याविरोधात खटला भरला. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुमच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सर्व माहिती मला द्या. याबाबतची तक्रार आम्ही राज्याचा निवडणूक आयोग, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे देऊ. हे कशासाठी? तर निवडणूक यंत्रणांचा काळा सोकू नये म्हणून. “

Story img Loader