अभिनेता क्षितिश दाते आणि ऋचा आपटे हे दोघेही नुकतेच लग्नबंधनात अडकल्याचं समजत आहे. अर्थात त्यांनी अगदी शांततेत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या काही मित्रमंडळींनी आज त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अनेक कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती मिळत आहे. ‘सांग तू आहेस ना’ मालिकेत दिसणारी अभिनेत्री शिवानी रांगोळे, अभिनेता शिवराज वायचळ, अक्षय वाघमारे यांनी इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत या दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर या दोघांना शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र या दोघांनीही अद्याप आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काहीही माहिती दिलेली नाही.

The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
balmaifal story for kids why we celebrate gudi padwa as a new marathi year
बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा
once man misbehaved with priya bapat (1)
प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”
kolhapur, aditya bundgar, youth stuck in mud, mud of riverbed
पाच दिवस नदीपात्रातील चिखलात अडकलेल्या आदित्यला मिळालं जीवदान, काळ आला होता पण वेळ आली नव्हती!


गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात या दोघांनी साखरपुडा केला होता. त्याबदद्लही दोघांनी एका वर्षानंतर सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत माहिती दिली होती. त्यावरही त्यांच्या चाहत्यांनी आणि मित्रमंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

ऋचा आणि क्षितिश ह्या दोघांनीही अनेक नाटकांमध्ये, मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्येही काम केलं आहे. क्षितिशची ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातली गण्या ही भूमिका प्रचंड गाजली. आता तो लवकरच ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातही दिसणार आहे. हे दोघेही ‘बन मस्का’ या मालिकेत एकत्र दिसले होते. तर ऋचा सध्या ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेत काम करत आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेच्या काही भागांमध्येही ती दिसली होती. तसंच ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतही तिने कुस्ती प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.