आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. विशेष म्हणजे सामान्यांप्रमाणेच त्यांनाही वैयक्तिक आयुष्य आहे. त्यामुळे त्यांच्याही आयुष्यात अनेक घटना घडत असतात. मात्र, वैयक्तिक आयुष्यातील कोणत्याही घटनेचा परिणाम ही कलाकार मंडळी त्यांच्या कामावर होऊ देत नाही. याविषयी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहे.

दरम्यान, ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये बोलत असताना या कलाकारांनी रंगमंचावरील अनेक रंगतदार किस्से चाहत्यांसोबत शेअर केले. तसंच रंगभूमीवर आल्यानंतर सगळी चिंता दूर होते असं त्यांनी सांगितलं.