करोना वायरसने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला चीनमधून फैलावलेला हा विषाणू आता ९०पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. आतापर्यंत एक लाखांहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. या करोना विषाणूने अगदी सुपरहिरो ‘थॉर’ला देखील सोडले नाही. करोना विषाणूच्या भितीमुळे सुपरहिरो थॉरची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता क्रिस हेम्सवर्थ याने भारतातून दौरा रद्द केला आहे.

‘ब्लॅक विडो’ हा नवा सुपरहिरोपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील पहिली फिमेल सुपरहिरो म्हणून ‘ब्लॅक विडो’ ओळखली जाते. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी क्रिस हेम्सवर्थ भारतात आला होता. मात्र करोना वायरसच्या भितीमुळे दौरा अर्ध्यावरच सोडून तो आपल्या मायदेशी परतला आहे.

क्रिस भारतातून परत गेल्यामुळे सुपरहिरो चाहते मात्र नाराज झाले आहेत. चित्रपटांमध्ये एका सौरमंडळाला नष्ट करणारा थॉर एका साध्या विषाणूला घाबरला अशा शब्दात चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

काय आहे कोरोना व्हायरस? कशी घ्याल काळजी

कोरोना व्हायरस सार्स’मध्ये(SARS) जागतिक साथीचा रोग म्हणून आधीच ओळखले गेले आहे, ज्यामुळे आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात मोठ्या प्रमाणात बाधीत रुग्ण आढळले. सध्याच्या माहितीनुसार, जलचर जीव अशा प्रकारचे विषाणू संक्रमित करण्याचे ज्ञात नाही, म्हणूनच सीफूडपासून हा वायरस उद्भवण्याची शक्यता नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये, मानवी संक्रमणाची ओळख पटली गेली आहे. सर्वांत प्रभावित होणारा महत्त्वाचा अवयवाचा सहभाग म्हणजे फुफ्फुसांचा आणि त्यानंतर आतडे. पारंपारिकपणे हे संक्रमण अशा लोकांवर परिणाम करतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, तरीही हे संक्रमण आजार नसलेल्या तरुण व्यक्तींवर देखील परिणाम करीत आहे. तरीही आतापर्यंत यावर, कोणतेही अँटिबायोटिक किंवा लस उपलब्ध नाही, म्हणूनच उपचार पूर्णपणे नैसर्गिक आधारावर केले जात आहेत.

संसर्गजन्य रोगांच्या पहिल्या तत्त्वांमध्ये, सर्वात वाईट बग्स मानवी संपर्काचे चक्र तोडून किंवा निर्जंतुकीच्या स्थितीत संपर्क राखून असतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याला एखाद्या संसर्गाची सुरूवात झाली आहे, तर तुम्ही डॉक्टरांना किंवा जवळच्या रुग्णालयात जाऊन भेट देणे गरजेचे आहे. निदान होईपर्यंत किंवा लक्षणांचे निराकरण होईपर्यंत स्वत: ला इतरांपासून दूर ठेवा. प्रभावित क्षेत्रांचा प्रवास करणे किंवा त्या भागातील लोकांशी संपर्क साधणे केवळ सरकारी सल्लामसलत किंवा तपासल्यानंतरच करावे.