पाकिस्तानी अभिनेत्री नादिया खानने बॉलीवूडमधील खान त्रिकुटाबद्दल केलेल्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम न करू देण्यासाठी कट रचल्याचा आरोप तिने या व्हिडीओत केला आहे. तिने ‘क्या ड्रामा है’ या शोमध्ये हजेरी लावली होती.

“सलमान, आमिर आणि शाहरुख या तीन खानसह भारतातील आघाडीचे कलाकार फवाद खानसारख्या तरुण पाकिस्तानी अभिनेत्याच्या लोकप्रियतेला घाबरले होते. पाकिस्तानी कलाकारांवर राजकीय कारणांसाठी बंदी घालण्यात आली नाही, तर भारतीय कलाकारांनी त्यांच्याविरोधात कट रचला होता,” असं नादिया म्हणाली.

Video: खूपच सुंदर गातात डॉ. नेने, माधुरी दीक्षितसह गायलं रोमँटिक गाणं; व्हिडीओ पाहिलात का?

ती उर्दूमध्ये म्हणाली, “फवादसारख्या आमच्या कलाकारांनी भारतात काम करायला सुरुवात केल्यावर त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली, त्यामुळे भारतातील काही मोठे कलाकार असुरक्षित झाले. त्यांनी हा राजकीय मुद्दा बनवला आणि त्यांच्यावर बंदी घालायला लावली. राजकारण्यांना आमच्या अभिनेत्यांपासून काही समस्या नव्हती, खरं तर भारतीय स्टार्सना त्यांच्या लोकप्रियतेपासून धोका वाटत होता. त्यांना माहीत होतं की भारतातील लोक पाकिस्तानी कलाकारांवर प्रेम करतील, कारण ते खरोखर प्रतिभावान आहेत. त्यांना लोकप्रियतेसाठी त्यांचं शरीर दाखवण्याची गरज नाही, त्यांचे बोलके डोळे आणि संवादफेकच पुरेसे आहेत.”

पती फोटोग्राफर तर सासरे मंत्री, स्वत: राजकुमारी असलेली अभिनेत्री अभिनय सोडून रमली संसारात, पाहा Photos

“भारतीय लोकांचं पाकिस्तानी कलाकारांवर खरंच प्रेम आहे. ते तिथे किती लोकप्रिय आहेत याची आपल्याला कल्पना नाही. पाकिस्तानी शो भारतीय शोच्या निम्म्या किंमतीत तयार केले जातात. आमचे कलाकार खूप मेहनती आहेत, त्यांचं काम जगभरात पाहिलं जावं असं त्यांना वाटतं. भारतात पाकिस्तानी कलाकारांचे खूप चाहते आहेत. त्यामुळेच तिन्ही खान असुरक्षित आहेत. कारण त्यांच्याकडे या वयाचे चांगले स्टार्स नाहीत,” असं ती म्हणाली.