गेल्या काही महिन्यांपासून देशात सुरु असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मनोरंजन क्षेत्रामध्ये अनेक चढउतार सुरु आहेत. अनेक नियमांच्या बंधनामध्ये मालिकांची शुटिंग सुरु तर झालीत पण तरीही अजूनही वातावरण सर्वसामान्य व्हायला वेळ लागेलच. अशा वेळेला प्रेक्षकांना जोडून ठेवण्यासाठी अनेक वाहिन्या जुन्या, लोकप्रिय मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात करतायेत. त्यामुळे सर्वांची आवडती ‘अवघाचि संसार’ ही मालिका देखील पुन्हा सुरु होणार आहे.

झी युवा वाहिनीने आता लोकप्रिय मालिका अवघाचि हा संसार पुन्हा एकदा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वी ‘जुळून येती रेशीमगाठी’ आणि ‘वहिनीसाहेब’ या दोन लोकप्रिय मालिका पुन्हा सुरु केल्या होत्या.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Nilesh sable said chala hawa yeu dya will come back soon dvr
‘चला हवा येऊ द्या’ येणार पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला? निलेश साबळे खुलासा करत म्हणाला, “त्या टीममध्ये सागर कारंडे…”
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

२००६मध्ये प्रदर्शित झालेल्या अवघाचि संसार मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचबरोबर मालिका त्यावेळी अतिशय लोकप्रिय ठरली होती. अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेता प्रसाद ओक यांच्या या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका होत्या. अमृताने यात आसावरी नावाच्या एका साध्या सरळ गावातल्या मुलीची भुमिका साकारली होती. आपल्या तत्वांशी प्रामाणिकअसणारी कर्तव्यनिष्ठ अशा आसावरीचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केलं होतं. आता ही मालिका २४ ऑगस्टपासून दुपारी ४ वाजता झी युवावर पुन्हा प्रदर्शित होणार आहे.