जुन्या चित्रपट संगीताच्या अनेक वैशिष्ट्यातील एक म्हणजे ‘उदास गाणी’. ऐकल्यावर आपण मात्र थोड्याश्या गंभीरतेकडून छान मूडकडे कधी जातो हेच आपल्या लक्षात येत नाही. याचे कारण अतिशय आत्मियतेने ते गायलेले व संगीतबद्ध केलेले असते.
तेरी दुनिया से हो के मजबूर चला
मैं बहोत दूर, बहोत दूर, बहोत दूर चला
किशोरकुमारच्या चाहत्यांचे हे एक अतिशय आवडते गाणे. किशोरदाच्या काही सर्वोत्तम भावनिक गाण्यांपैकी हे एक आहे. हे गाणे राजेन्द्र भाटीया दिग्दर्शित ‘पवित्र पापी’ (१९७०) या चित्रपटातील आहे हा तपशील तसा फार कोणी विचारात घेत नसले तरी महत्त्वाचा आहे.
इस कदर दूर के फिर लौट की भी आ ना सकूँ
ऐसी मंज़िल की जहाँ खुद को भी मैं पा ना सकूँ
और मजबूरी है क्या इतना भी बतला ना सकूँ
गाण्याचा एकूणच भावार्थ स्पष्ट सांगतोय की हे प्रियकराच्या प्रेम विरहाचे दु:ख आहे, त्याच्या वेदनाच त्यातून व्यक्त होताहेत. जिंद (हरयाणा) या छोट्या शहरातील नायक (अजय सहानी) आपण जिच्या प्रेमात पडलोय तिचा (तनुजा) तिचा विवाह आपल्याशी न झाल्याने कमालीचा व्यथित झाला असून, या शहरातूनच बाहेर पडण्याचे पाऊल टाकत तो गाणे गातोय . अजय सहानीने काही वर्षांनी आपले नाव बदलून परिक्षित सहानी केले आणि मग तो त्याच नावाने ओळखला गेला.
आँख भर आई अगर अश्कों को मैं पी लूँगा
आह निकली जो कभी होठों को मैं सी लूँगा
तुझ से वादा है किया इसलिए मैं जी लूँगा
प्रियकर सावकाश पावले टाकत टाकत दु:खात गातोय . नायिकेचे लग्न झालेय ती देखील माहेर सोडताना रडतेय. त्या दु:खात आपल्यावर प्रेम करणारा आपला होऊ न शकल्याची वेदनाही आहेच. प्रियकर गात गात एका भग्नावस्थेतील इमारतीत येतो. त्यामुळे हे गाणे जास्तच भेदक वाटते. प्रेम धवन याने गीत व संगीत या दोन्ही जबाबदाऱ्या पेलल्यात. नुसतेच गाणे ऐकतानाही ते विलक्षण प्रभावित करतेय हे कौतुकास्पद.
कुछ नहीं साथ मेरे, बस हैं खताएं मेरी
किशोर कुमार गाण्यातील ‘दर्द ‘ नेमका पकडतो. आता आपण या गाण्याच्या शेवटाकडे आलो असता एक छान गाणे ऐकल्याच्या मन:स्थितीत येतो. तर नवविवाहित नायिका आपल्या पतीसोबत बाहेरगावी जाणारी ट्रेन पकडताना त्याच ट्रेनमध्ये नायकही चढतोय हे पाहून जोरदार हुंदका देते….
चित्रपटात हे गाणे फिट होतेच. पण चित्रपट संगीत शौकीन मात्र हे गंभीर स्वरुपातील गाणे मंत्रमुग्ध करणारे असेच आहे.
दिलीप ठाकूर