अभिनेता रणदीप हुड्डा बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. गेले काही महिने त्याचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट फारच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सर्वांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे. या चित्रपटाच्या कामात काय प्रगती होत आहे हे वेळोवेळी चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांशी शेअर केलं आहे. अभिनेत्याने नुकतंच एनएआयशी बोलताना यातील भूमिकेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली.

रणदीप म्हणाला, “माझे वजन खूप दिवसांपासून कमी आहे, मला हे मान्य आहे की माझे वजन जास्त काळ कमी नसावे मात्र विनायक दामोदर सावरकरांवरील बायोपिकसाठी हे अत्यावश्यक आहे आणि मी साकारत असलेल्या पात्राला न्याय देण्यासाठी मी स्वतःला कायम झोकून देतो. अशा प्रकारच्या बदलांमुळे शरीरावर परिणाम होतो. .म्हणून मी थोडावेळ यामधून ब्रेक घेतो अथवा काही काळ नवा चित्रपट करण्यासाठी थांबतो. शारीरिक बदलांसाठी घेतलेला काळ मला फायद्याचा ठरतो.” रणदीप या चित्रपटासाठी मेहनत घेत आहे. त्याने ‘सरबजीत’ चित्रपटासाठी मेहनत घेतली होती.
तो पुढे म्हणाला, “अशा प्रकारच्या बदलांमुळे शरीरावर त्याचा परिणाम होतो. म्हणून मी थोडावेळ विश्रांती घेतो अथवा काही काळ नवा चित्रपट करण्यासाठी थांबतो. शारीरिक बदलासाठी घेतलेला काळ मला फायद्याचा ठरतो.” रणदीप या चित्रपटासाठी मेहनत घेत आहे. त्याने ‘सरबजीत’ चित्रपटात त्याने स्वतःचे वजन कमी केले होते.

Brazilian woman brings dead man in wheelchair to bank to sign loan
पैशासाठी काहीपण! मृत काकांना व्हिलचेअरवर घेऊन बँकेत पोहचली महिला अन्….धक्कादायक घटनेचा Video Viral
Hyderabad man’s support empowers house help
गुलाबी सायकल अन् तिच्या चेहऱ्यावरील आनंद! स्वयंपाकीण ताईचे कष्ट वाचवण्यासाठी व्यक्तीने केली खास मदत, Viral Video
Man wraps utensils in plastic to avoid washing them.
भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचं चित्रीकरण महाराष्ट्र आणि लंडनमध्ये होणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची संकल्पना संदीप सिंग यांची असून उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी हा चित्रपट लिहिला आहे. रणदीपच्या या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त २६ मे २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.