आपल्या अफेअर्समुळे चर्चेत राहिलेल्या विवेक ओबेरॉयने १४ वर्षांपूर्वी प्रियंका अल्वाशी लग्न केलं. या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. कोणत्या गोष्टीमुळे विवेक व प्रियंकाची भांडणं होतात, याचा खुलासा आता त्यानेच केला आहे.

प्रियंकाशी भांडण वेळेसाठी होतं, असं इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विवेकने सांगितलं. “मी खूप नशीबवान आहे. मी काहीतरी चांगले कर्म केले असतील किंवा कदाचित माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद असेल की मला इतकी समजदार पत्नी मिळाली. आम्ही फक्त वेळेसाठी भांडतो,” असं विवेकने नमूद केलं.

नात करिश्मा जन्मल्यावर तिला पाहायला जाण्यासाठी राज कपूर यांनी दिला होता नकार, ठेवली होती ‘ही’ अट

पुढे तो म्हणाला, “माझ्या पत्नीला हिरे, फॅन्सी बॅग किंवा कार या गोष्टी नको आहेत, तिला फक्त माझे प्रेम आणि वेळ हवा आहे. तिला आमच्या मुलांबरोबर आणि कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवायचा असतो. मी खूप काम करतो. मी काम आणि कुटुंब या दोन्ही गोष्टी संतुलित करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र माझ्याकडे इतकं काम आहे की मला ते शक्य होत नाही. मी परफेक्शनिस्ट आहे, मला माझं काम परफेक्ट करायचं असतं. त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छितो की जर तुमची पत्नी तुम्ही वेळ द्यावा यासाठी तुमच्याशी भांडत असेल तर तुम्ही खूप नशीबवान आहात.”

“मी मनापासून प्रेम केलं,” विवेक ओबेरॉयचं वक्तव्य; म्हणाला, “माझ्या लग्नात एक्स गर्लफ्रेंड्स…”

भांडणानंतर तो तिची नाराजी कशी दूर करतो हेही विवेकने सांगितलं. “जेव्हा माझी पत्नी नाराज असते, तेव्हा ती झोपलेली असताना तिच्याआधी मी उठतो. ती दक्षिण भारतीय आहे, तिला कॉफी आवडते. मी तिची आवडती फिल्टर कॉफी बनवायला शिकलोय आणि मी ती उत्तम बनवतो. कॉफी बनवून मी ती ट्रेमध्ये सजवून नेतो, छान म्युझिक लावतो आणि तिला उठवतो. यामुळे तिच्या चेहऱ्यावर हसू येतं. पहिला घोट घेत ती म्हणते, ‘मी अजूनही तुझ्यावर नाराज आहे’ आणि मग कॉफीचा शेवटचा घोट घेते तोवर तिचा राग निघून जातो,” असं विवेक म्हणाला.

vivek oberoi with wife priyanka alva
विवेक ओबेरॉय व त्याची पत्नी प्रियांका अल्वा (फोटो – इन्स्टाग्राम)

तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “मी भारतात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवेक अन् प्रियंकाची भेट

विवेक ओबेरॉय एका मुलाखतीत म्हणाला होता की त्याला लग्न करायचं नव्हतं. “मला लग्न करायचं नव्हतं, त्यामुळे मी ब्रेकअप करत होतो. सिरिअस रिलेशनशिपमुळे खूप ताण येत होत होता. ‘लग्न का करायचं?’ असा मला वाटत होतं. मग माझी आई म्हणाली, ‘या एका मुलीला भेट, तिला भेट आणि तुला ती आवडली नाही तर तू नकार दे. यानंतर मी तुला कधीच कोणत्याही मुलीला भेट असं म्हणणार नाही. मी तिला दुपारी भेटून परत यायचं ठरवलं. आई म्हटलीये म्हणून भेटून परत येईन असा मी विचार केला. पण प्रियंकाला भेटल्यावर आम्ही इतका वेळ गप्पा मारल्या की मी फ्लाइट मिस केली. मग मी दोन-तीन दिवस तिकडेच थांबलो. तिला भेटल्यावर दोन तासातच मी तिच्या प्रेमात पडलो होतो,” असं विवेक म्हणाला होता.