बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने सक्तीने क्वारंटाइन केलं आहे. या प्रकरणी बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बीएमसीने हा अगदीच दुदैवी निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरणाची CBI चौकशी होणार; केंद्रानं शिफारस स्वीकारली
पटना IG ने BMC के चीफ़ को पत्र लिखकर IPSविनय तिवारी को कोरंटिन करने का विरोध करते हुए उनको मुक्त करने का अनुरोध किया था जिसको ठुकरा दिया गया है.BMC ने पत्र का जबाब भी पटना पुलिस को भेज दिया है.यानि हमारे SP विनय तिवारी अब 14 दिन तक वहीं क़ैद रहेंगे.BMCका यह फ़ैसला दुर्भाग्यपूर्ण! pic.twitter.com/ZHLfeZMGoo
— IPS Gupteshwar Pandey (@ips_gupteshwar) August 5, 2020
अवश्य पाहा – राम मंदिर आणि भाजपाचा अजब योगायोग; शत्रुघ्न सिन्हा यांनी दाखवलं ते दुर्मिळ नाणं
“पाटणाच्या आयजींनी विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून मुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेला पत्र लिहिलं होतं. या पत्रातील मागणीला बीएमसी अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलं आहे. विनय तिवारी आता १४ दिवस सक्तीच्या क्वारंटाइनमध्ये राहणार आहेत. बीएमसीने घेतलेला हा दुर्दैवी निर्णय आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन गुप्तेश्वर पांडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
IPS officer Binay Tiwari reached Mumbai today from patna on official duty to lead the police team there but he has been forcibly quarantined by BMC officials at 11pm today.He was not provided accommodation in the IPSMess despite request and was staying in a guest house in Goregaw pic.twitter.com/JUPFRpqiGE
— IPS Gupteshwar Pandey (@ips_gupteshwar) August 2, 2020
विनय तिवारी मुंबईत तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या टीमचे नेतृत्व करत आहेत. सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारावर तपास करण्यासाठी हे पथक मुंबईत आले आहे. २४ जूनला सुशांत सिंह राजपूतने वांद्रयातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मागच्या महिन्यात सुशांतच्या वडिलांनी पाटण्यामध्ये या प्रकरणी एफआयआर नोंदवला व तक्रारीत रेहा चक्रवर्तीचे नाव घेतले. आतापर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींसह ५६ जणांची या प्रकरणी चौकश करण्यात आली आहे.