अभिनेता प्रियदर्शन जाधव नेहमीच चर्चेत असतो. प्रियदर्शनने अभिनयाबरोबरच लेखन व दिग्दर्शन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रियदर्शने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘राजश्री मराठी’ या एण्टरटेन्मेंट मीडियाला नुकतीच प्रियदर्शन जाधवने मुलाखत दिली. त्यावेळेस त्याने त्याच्या शालेय जीवनातील एक किस्सा सांगितला आहे.
प्रियदर्शन म्हणाला, “माझं पूर्ण बालपण कोल्हापूरात गेलं. माझ्या घरात सगळे आभ्यासात हुशार होते पण मी अनेकदा गटांगळ्या खालल्या आहेत. मी १० वीत नापास झालो. पण माझ्या घरच्यांनी मला कधीच जाणवू दिलं नाही किंवा टोचून बोलले नाहीत मुंबईत पटवर्धनांची अभिनयाची कार्यशाळा अशी वृत्तपत्रात जाहीरात आली होती. १०वीत नापास झाल्यानंतर मी ती कार्यशाळेत सहभाग घेतला. ऑक्टोबरमध्ये येऊन मी परत १०वीचा पेपर दिला आणि त्यात पास झालो. त्यानंतर मी मुंबईत जो आलो तो परत कोल्हापूरात गेलोच नाही.”
दरम्यान, लवकर प्रियदर्शन जाधवचा ‘किर्रर्रर्र काटा किर्रर्रर्र’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचे शूटिंग, एडिटिंग पूर्ण झाले आहे. जिओ स्टुडिओअंतर्गत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.