Ram Gopal Varma On Allu Arjun Arrest : हैदराबाद पोलिसांनी शुक्रवारी (१३ डिसेंबर २०२४ रोजी ) अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केली. त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २: द रूल’च्या ४ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या प्रीमियरला अल्लू अर्जुनने हजेरी लावली होती. याचवेळी चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्लू अर्जुनवर कारवाई करण्यात आली. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा अल्लू अर्जुनच्या अटकेला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना जबाबदार असल्याचे मानत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

राम गोपाल वर्मा यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमावर पोस्ट करत म्हटले की, “सर्वांनाच आश्चर्य वाटतं आहे की, आदरणीय मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अल्लू अर्जुनबरोबर असं का केलं. मला वाटतं, त्यांनी ही कारवाई ‘पुष्पा २: द रूल’चं दुसऱ्या आठवड्यातील कलेक्शन वाढवण्यासाठी केली.”

Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Saif Ali Khan Attack
Saif Ali Khan : “फक्त सैफ अली खान याचं आडनाव खान आहे म्हणून…”, हल्ल्याबाबत गंभीर शंका घेणार्‍या आव्हाडांना गृहराज्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”

हेही वाचा…अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर रवी किशन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा दिवस चित्रपटसृष्टीसाठी…”

राम गोपाल वर्मा पुढे म्हणाले, “राज्य सरकारने मुद्दामहून कमकुवत पुरावे सादर केले, त्यामुळे अल्लू अर्जुनला काही तासांत जामीन मिळाला. त्यामागे अल्लू अर्जुन अधिक लोकप्रिय होईल आणि बॉक्स ऑफिसवर यश मिळवत राहील ही भावना होती.” त्यांनी शेवटी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे आभार मानत लिहिले, “धन्यवाद श्रीमान रेवंत रेड्डी. ”

अल्लू अर्जुन अटक प्रकरणावर रेवंत रेड्डी यांचे स्पष्टीकरण

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी सांगितले की, या प्रकरणात राज्य सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही आणि कायद्याने त्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितले, “सगळे लोक त्याच्या अटकेबद्दल बोलत आहेत. पण चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं काय? तिचा मुलगा अजूनही कोमात आहे, तो बरा झाल्यानंतर त्याची आई कुठंय हे विचारेल, तेव्हा त्याला काय सांगायचं?अल्लू अर्जुनने चित्रपट बनवला आणि पैसे कमावले. त्याच्याशी सामान्य माणसाचे काहीच देणंघेणं नाही. अल्लू अर्जुननं सीमेवर जाऊन देशासाठी युद्ध केलं आहे का? मग त्याचा एवढा गवगवा कशासाठी?”

हेही वाचा…अभिनयातील ब्रेकचा उल्लेख असणाऱ्या ‘त्या’ पोस्टवर विक्रांत मॅसीने दिले स्पष्टीकरण म्हणाला, “सोशल मीडियाचा दबाव…”

नेमके प्रकरण काय ?

४ डिसेंबर २०२४ रोजी अल्लू अर्जुनने ‘पुष्पा २: द रूल’च्या प्रीमियरसाठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी प्रचंड गर्दी झाल्याने गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनाविरोधात एफआयआर नोंदवला आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी योग्य ती खबरदारी न घेतल्याचा आरोप केला.

Story img Loader