रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका लॉकडाउनमुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा प्रदर्शित करण्यात आली. त्यामुळे सर्व कालाकार पुन्हा एकादा चर्चेत आहेत. या कलाकारांच्या यादीमधील ‘सीत’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्या विशेष चर्चेत रंगल्या होत्या. या चर्चा त्यांनी एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राम म्हटल्याने सुरु झाल्या आहेत.
नुकताच दीपिका यांनी ‘अमर उजाला’ला मुलाखत दिली. दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्याच्या काळातील राम आहेत असे म्हटले. ते दररोज काही तरी चांगले काम करण्याच्या प्रयत्नामध्ये असतात म्हणून ते सध्याच्या काळातील राम आहेत असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.
पुढे त्यांना तुम्ही राजकारणात पुन्हा प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी, मला राजकारणामध्ये पुन्हा प्रवेश करायचा आहे असे मी कधीही म्हटलेले नाही. पण मी सामाज सेवा करु इच्छिते. कारण मला वाटते की माझ्या बोलण्याने एखाद्या गोष्टीमध्ये बदल घडणार असेल तर मला त्यावर बोलायला मला नक्की आवडेल असे उत्तर दिले.
रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मालिकेती कलाकार जवळपास ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यातील सीता हे पात्र साकराणाऱ्या अभिनेत्री दीपिका यांच्या चांगल्याच चर्चा सुरु झाल्या. त्यांनी १९८३मध्ये ‘सुन मेरी लैला’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर १९८९ ‘में घर का चिराग’, १९९१ मध्ये ‘रुपये दस करोड़’ आणि १९९४मध्ये ‘खुदाई’ या चित्रपटात काम केले. तसेच त्यांनी हिंदीसह कन्नड़, तामिळ आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे.