बॉलिवूड अभिनेते रणजीत हे ७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते आहेत. रणजीत सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब आहेत. तरी देखील रणजीत हे बॉलिवूडमधील त्यांच्या नकारात्मक भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी ३५० पेक्षा जास्त चित्रपटात बलात्कारीची भूमिका साकारली होती. विशेषत: बलात्कारी म्हणून रणजीत यांना ओळख मिळाल्याचे त्यांच्या पत्नी म्हणतात. तर चित्रपटात अशी भूमिका साकारल्याने त्यांच्या खासगी जीवनात याचा परिणाम झाला होता. या विषयी रणजीत यांनी एका मुलाखतीत सांगितले.

रणजीत यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बलात्कारीची भूमिका सतत साकारल्याने या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर कसा झाला या विषयी त्यांनी सांगितले आहे. “मी माझ्या आई-वडिलांना कधीच भांडताना पाहिले नव्हते. माझ्या पत्नीचे स्वतःचे मत आहे आणि त्यात आमचे दोघांचे राजकारणाबद्दलची मत वेगळी आहेत. आमच्या दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे”, असे रणजीत त्यांच्या पत्नी विषयी सांगताना म्हणाले.

पत्नी आलोकासोबतच्या त्यांच्या भेटीबद्दल बोलताना रणजीत म्हणाले, “मी तिला माझ्या चित्रपटात कास्ट करणार होतो आणि तेव्हाच मी तिला भेटलो. पण, माझ्या आई -वडिलांनी माझ्यासाठी तिला पसंत केले. ती मॉर्डन, पण घर सांभाळूण घेणारी होती, इंग्रजी आणि पंजाबी बोलू शकत होती. मला आणखी काय पाहिजे होते. माझा धाकटा भाऊ आणि बहीण दोघांचे लग्न झाले होते आणि माझ्या आई-वडिलांना माझं लग्न करून द्यायचं होतं. पण त्या काळाच रणजीत यांना त्यांची मुलगी कोण देणार असा प्रश्न होता.”

आणखी वाचा : ‘इन्स्पेक्टर साहेब बसले आहेत आणि एसपी साहेब…’, अक्षयच्या पोस्टवर कमेंट करत पोलिस अधिकाऱ्यांनी केले ट्रोल

रणजीत यांचे आलोकाशी लग्न झाले. पण तेही तितके सोपे नव्हते. आलोका यांनी रणजीतशी लग्न केल्यामुळे त्यांचे कुटुंब ना खुश होते. याविषयी रणजीत म्हणाले, “शेवटी मी आलोकाशी लग्न केले. पण, यामुळे तिचे नातेवाईक निराश झाले होते. मी माझ्या सासरच्या लोकांशी बोललो आणि खाजगी समारंभांसाठी आग्रह धरला. त्यानंतर माझ्या पत्नीच्या एका नातेवाईकाला कळले की तिने माझ्याशी लग्न केले आहे.”

आणखी वाचा : “आम्ही दोघांनी अजुन लग्न केले नाही…”,सलमान खानने केला त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा

पुढे या विषयी सांगताना रणजीत म्हणाले, “तिच्या त्या नातेवाईकाने माझ्या सासूला सांगितले की त्यांनी त्यांच्या मुलीच लग्न माझ्याशी करण्यापेक्षा विष द्यायला पाहिजे होते. त्यांनी माझ्या सासूला राग आणण्यासाठी सांगितले की, त्यांच्या मुलीच्या शरीरावर जखमेच्या खुणा आहेत का? हे त्यांनी पाहायाला हवे. तो संध्याकाळी मद्यपान करत असेल आणि तिला मारहाण करत असेल. यावर माझ्या सासरच्यांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिले आणि म्हणाले, जर असं काही झालं तर सगळ्यात जास्त त्रास हा रणजीतला होईल.”