प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ चित्रपट सध्या बराच गाजतोय. सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशीच चर्चा ६ वर्षांपूर्वी ‘सैराट’ चित्रपटाची झाली होती. नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट त्यावेळी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. या चित्रपटातील काही सीन तर प्रेक्षकांमध्ये एवढे लोकप्रिय झाले होते की त्याची जोरदार चर्चा झाली होती. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर आता ६ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र आली. ‘झुंड’ चित्रपटाच्या निमित्तानं रिंकू आणि आकाश पुन्हा एकत्र पाहायला मिळाले.

‘झुंड’ चित्रपटाचं प्रमोशन सुरू असताना आकाश आणि रिंकू म्हणजेच प्रेक्षकांचे लाडके आर्ची आणि परश्या यांनी त्यांच्या ‘सैराट’ चित्रपटातील एक लोकप्रिय सीन पुन्हा रिक्रिएट केला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. तब्बल ६ वर्षांनंतर हा सीन रिक्रिएट करताना आर्ची आणि परश्याचा तोच अंदाज पुन्हा पाहायला मिळाला.

आणखी वाचा- Video: भर रस्त्यात काजोल आणि करीना गाडीतून उतरल्या अन्…

सैराट चित्रपटात एक सीन आहे ज्याची प्रेक्षकांमध्ये बरीच क्रेझ पाहायला मिळाली होती. यामध्ये आर्ची खेळत असताना परश्या तिला एकटक बघत असतो आणि हे जेव्हा तिच्या लक्षात येत तेव्हा ती बेधडकपणे त्याला, ‘तू का माझ्याकडे बघतोस?’ असं विचारते. त्यावर परश्या ‘तू का माझ्याकडं बघतेस?’ असं म्हणतो. मग गप्प राहिल ती आर्ची कसली. ती देखील त्याला म्हणते, ‘मी बघीन नाहीतर कायपण करेन’ यावर परश्या देखील तिला, ‘मग मी पण बघीन नाहीतर कायपण करेन. तुला नसेल आवडत तर नको बघू की’ असं प्रतिउत्तर देतो आणि मग आर्ची पण त्याला, ‘मी कुठं म्हणलं मला नाही आवडत’ असं म्हणते. हाच सीन रिंकू आणि आकाशनं ‘झुंड’च्या प्रमोशन कार्यक्रमात रिक्रिएट केला.

आणखी वाचा- हृतिक रोशन आजारी गर्लफ्रेंडची अशी घेतोय काळजी, सबा आझादनं शेअर केला फोटो

View this post on Instagram

A post shared by ❤️RinKash Love❤️ (@rinkash_love)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आज ६ वर्षांनंतरही या दोघांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. दोघांनीही त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून केली होती. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. या चित्रपटानं त्यावेळी ११० कोटींचा गल्ला जमवला होता. आर्ची आणि परश्याची ही जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली होती. यासोबतच त्यांच्या सहज आणि अप्रतिम अभिनयाचंही बरंच कौतुक झालं होतं.