‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेच्या निर्मितीसाठी त्यांनी आपलं घर देखील विकलं होतं. दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यावेळी अमोल कोल्हेंसह प्रेक्षकसुद्धा भावूक झाले होते. छत्रपती संभाजी महाराजांवर मालिकेची निर्मिती करण्याचा विचार, तो सत्यात उतरवण्यासाठी केलेली धडपड आणि इतर बऱ्याच गोष्टी अमोल कोल्हेंनी ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर उलगडून सांगितल्या.

पाहा त्यांची संपूर्ण मुलाखत :

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला होता. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले.