टीव्ही विश्वात नवनवीन घडामोडी घडत असतात. टाळेबंदीमध्ये लोकांनी जुन्या दर्जेदार मालिका पुन्हा पुन्हा बघितल्या. ‘आभाळमाया’, ‘प्रपंच’, ‘४०५ आनंदवन’, ‘थरार’ या मालिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. डेली सोप हा प्रकार उदयास आल्यानंतरदेखील काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या त्यातीलच एक मालिका म्हणजे ‘देवयानी’. प्रेक्षकांसाठी म्हणजे ही मालिका पुन्हा एकदा पाहता येणार आहे.

‘आई कुठे काय करते’, ‘या फुलाला सुगंध मातीचा’ स्टार प्रवाहवरील या मालिका आज प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मात्र १० वर्षांपूर्वी गाजलेली मालिका म्हणजे ‘देवयानी’. रात्री ८. ३० वाजता ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित व्हायची. या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावले होते. या मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. देवयानी, संग्राम, आबासाहेब अशी प्रसिद्ध पात्र. संग्रामचा ‘तुमच्यासाठी काही पण’ हा डायलॉग खूप प्रचलित झाला होता.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

या मालिकेत शिवानी सुर्वे, संग्राम साळवी, नागेश भोसले, देवदत्त नागे, माधव देवचके, भाग्यश्री मोटे असे दिग्गज कलाकार या मालिकेत होते . या मालिकेची लोकप्रियता पाहता वाहिनीने या मालिकेचे पुनःप्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला असून ही मालिका १८ डिसेंबर पासून संध्याकाळी ४.३० वाजता ही मालिका प्रक्षेपित होईल. वाहिनीच्या या निर्णयाने या मालिकेचे चाहते नक्कीच खुश होतील.