Aishwarya Narkar : अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी गेली अनेक वर्षे छोट्या पडद्यावर आपलं अधिराज्य गाजवलं आहे. सध्या त्या अभिनयाच्या जोडीने सोशल मीडियावरील व्हायरल गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवत असतात. ऐश्वर्या व त्यांचे पती अभिनेते अविनाश नारकर यांचे डान्स व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होतात.

मात्र, अनेकदा अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यांच्या व्हिडीओवर किंवा फोटोंवर युजर्स नकारात्मक कमेंट्स करतात. या सगळ्या ट्रोलर्सला अभिनेत्री स्पष्ट शब्दांत उत्तर देत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या डान्स व्हिडीओवर एका महिलेने निगेटिव्ह कमेंट केली होती. याचा स्क्रीनशॉट ऐश्वर्या नारकरांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत स्पष्ट उत्तर दिलं आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकर “चिकनी चमेली…” गाण्याच्या म्युझिकवर डान्स करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. नारकर कपलने सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या स्टेप्स फॉलो करून “चिकनी चमेली…” गाण्यावर ठेका धरला होता. या दोघांच्या डान्सचं त्यांच्या चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. पण, एका महिलेने ऐश्वर्या नारकरांच्या व्हिडीओवर कमेंट करत, “दोघांना पण म्हातारचळ लागलंय” असं म्हटलं आहे.

या निगेटिव्ह कमेंटचा स्क्रीनशॉट अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. “म्हातारचळ लागलंय” म्हणणाऱ्या महिलेला ऐश्वर्या नारकरांनी “दूध का दूध…पानी का पानी” म्हणत सडेतोड उत्तर दिलं आहे. या पोस्टसह ऐश्वर्या यांनी संबंधित महिलेच्या अकाऊंटवरील काही फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केले आहेत. “दुसऱ्यांना बोलण्याआधी स्वत:कडे बघा” असा सूचक इशारा हा स्क्रीनशॉट शेअर करून अभिनेत्रीने सर्व ट्रोलर्सला दिला आहे. तसेच, या स्टोरीमध्ये अभिनेत्रीने संबंधित महिलेला टॅग सुद्धा केलं आहे.

तसेच, ज्या नेटकऱ्यांनी डान्स व्हिडीओ पाहून सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत अशा लोकांचे सुद्धा अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Aishwarya Narkar
ऐश्वर्या नारकरांचं ट्रोलर्सना स्पष्ट उत्तर ( Aishwarya Narkar )

दरम्यान, ऐश्वर्या नारकरांनी यापूर्वी सुद्धा असंख्य नेटकऱ्यांना स्पष्ट शब्दांत उत्तरं देत आपली बाजू मांडली आहे. त्यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर काही महिन्यांपूर्वीच त्यांची महत्त्वाची भूमिका असलेल्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता ऐश्वर्या नारकर येत्या काळात आणखी कोणत्या नव्या भूमिकेत झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.