‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काळात दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘घरोघरी मातीच्या चुली’ व ‘साधी माणसं’ या दोन नव्या मालिका १८ मार्चपासून सुरू होणार आहेत. रेश्मा शिंदे, सविता प्रभूणे, प्रमोद पवार, उदय नेने, आरोही सांबरे अभिनीत ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणार आहे. तर शिवानी बावकर, आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘साधी माणसं’ मालिका संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे आता ‘स्टार प्रवाह’वरील कोणत्या जुन्या मालिका ऑफ एअर होणार? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेची वेळ जाहीर होताच ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, अशी चर्चा सुरू झाली. पण असं काही न होता ‘आई कुठे काय करते’ मालिकेची वेळ बदलण्यात आली. १८ मार्चपासून लाडकी अरुंधती दुपारी २.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण कोणती जुनी मालिका ऑफ एअर होणार? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे.

salman khan big boss 18 date time and new theme
Bigg Boss 18: सलमान खानचा शो केव्हा, कुठे पाहता येणार? जाणून घ्या प्रिमियरची तारीख अन् स्पर्धकांची नावं
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात
Chess Olympiad Competition Indian men and women teams win gold sport news
दोन दशकांची प्रतीक्षा संपल्याचा आनंद! बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतील सुवर्णयशानंतर द्रोणावल्ली हरिकाची भावना
Ian Chappell Statement on Jasprit Bumrah Rishabh Pant innings in Border Gavaskar Trophy Test Series sports news
बुमरा, पंतची लय महत्त्वाची; बॉर्डरगावस्कर मालिकेबाबत चॅपल यांचे विधान
Singer Dhvani Bhanushali acting debut
गायिका ध्वनी भानुशालीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण
National Film Day, Navra Maza Navsacha 2,
‘राष्ट्रीय चित्रपट दिना’चा मुहूर्त फळला, ‘नवरा माझा नवसाचा २’सह सगळ्याच चित्रपटांचे शो ८० ते ९० टक्के हाऊसफुल
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या

हेही वाचा – Video: “…तर मी नग्न होऊन नाचेन”, रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष पुरवठा केल्याच्या आरोपावर एल्विश यादवचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

सुत्राच्या माहितीनुसार, ‘स्टार प्रवाह’वरील ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १८ जुलै २०२३ला सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस उतरली. अभिनेत्री शर्वरी जोगने गुंजा तर अभिनेता हर्षद अतकरीने कबीर ही भूमिका उत्तमरित्या साकारली. त्यामुळेच गुंजा आणि कबीरच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण एक वर्षही न होता ही मालिका आता ऑफ होणार असल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा – आपली यारी लय भन्नाट हाय! सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत आपल्या पतीसह मेघा धाडेच्या नव्या व्हिलावर सुट्ट्या करतायत एन्जॉय, पाहा व्हिडीओ

दरम्यान, ‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेची जागा ‘साधी माणसं’ ही नवी मालिका घेणार आहे. या मालिकेत शिवानी ‘मीरा’ तर आकाश ‘सत्या’च्या भूमिकेत झळकणार आहे. मीरा ही फुलविक्रेती आहे, तर सत्या कामधंदे नसणारा दारुच्या आहारी गेलेला तरुण दाखवण्यात आला आहे. एकाच शहरात राहत असले तरी दोघांचा भिन्न स्वभाव आहे. आता या दोघांची भेट कशी होणार? नियती यांच्याबरोबर काय करणार? हे या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.