झी मराठी वाहिनीवरसातत्याने वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित ‘लोकमान्य’ ही मालिका नुकतीच सुरु झाली. या मालिकेत टिळकांच्या लहानपणीची भूमिका साकारली आहे अभिनेता नील देशपांडेने साकारली आहे. विशेष म्हणजे त्याचे कुटुंबीय हे टिळकांच्या परिचयाचे आहेत. एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला आहे.

निल देशपांडेने मालिकेच्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. इटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने भूमिकेबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला की, “ही मालिका लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित आहे. लोकमान्य टिळकांचे जीवन आम्ही याआधी कधीच पाहिले नव्हते, पण आता या मालिकेच्या माध्यमातून आम्ही ते पाहणार आहोत. टिळकांचा बालपणापासून लोकमान्य होण्यापर्यंतचा प्रवास बघा.”

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Letter to Vijay Shivtare
“माझा नेता पलटूराम निघाला, आता..”; विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांनी लिहिलेलं खरमरीत पत्र व्हायरल

“महाराष्ट्राची हास्यजत्रेत त्याचं टॅलेंट…” ओंकार भोजनेबद्दल वनिता खरातची प्रतिक्रिया चर्चेत

आपल्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती देताना नील म्हणाला, “मी लोकमान्य टिळकांची बालपण आणि किशोरवयीन भूमिका साकारत आहे. ही भूमिका साकारण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. जेव्हा मला ही भूमिका मिळाली तेव्हा मला वाटले की ही मोठी संधी योग्य आहे. कारण माझे पणजोबा लोकमान्य टिळक यांच्याबरोबर मंडाले तुरुंगात होते. या मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप भाग्यवान आहे.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

…म्हणून मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून बाहेर पडलो; अखेर ओंकार भोजनेचा खुलासा

टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहेत. ‘दशमी क्रिएशन्स’ने मालिकेची निर्मिती केली असून स्वप्निल वारके यांनी दिग्दर्शन केले आहे. बुधवार-शनिवार रात्री ९:३० वाजता या मालिकेचे प्रसारण होते.