‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी म्हणून हार्दिक जोशी-अक्षया देवधरला ओळखले जाते. हे दोघेही २ डिसेंबर २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. आज हार्दिक आणि अक्षयाचा साखरपुडा होऊन वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने त्याने पोस्ट केली आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही कायमच चर्चेत असतात. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने ३ मे २०२२ रोजी अक्षय्य तृतीयाच्या मुहुर्तावर साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
आणखी वाचा : “माझं आईशी एकदा भांडण झालेलं कारण अक्षया…” हार्दिक जोशीचा गौप्यस्फोट

अक्षया आणि हार्दिकच्या साखरपुड्याला आज वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने हार्दिकने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अक्षया हार्दिकला अंगठी घालताना दिसत आहे. तसेच हार्दिक अक्षयाला रोमँटिक पद्धतीने प्रपोज करत अंगठी घालताना दिसत आहे.

“माझी जवळची मैत्रीण, माझं प्रेम, तू नेहमीच होतीस, माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण. साखरपुड्याच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, असे हार्दिकने कॅप्शन देताना म्हटले आहे.

आणखी वाचा : “माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न अन् चर्चा मात्र बोल्ड फोटोशूटची”, पल्लवी पाटीलने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “ही वेळ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अक्षया आणि हार्दिकच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. काही महिन्यांपूर्वी हार्दिकने अक्षय्य तृतीयाबरोबर साखरपुडा करण्याबद्दलचे कारण सांगितले आहे. अक्षयाला तिच्या वाढदिवशी साखरपुडा करायचा होता. तिचा जन्म अक्षय्य तृतीयाचा आहे. म्हणून मग ३ मे रोजी साखरपुडा केला”, असे हार्दिकने सांगितले होते.