अभिनेत्री जुई गडकरी ही कायमच चर्चेत असते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत जुई ही मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. जुईने या मालिकेत सायली नावाचे पात्र साकारले आहे. तिच्या या पात्राला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच जुईने तिच्याबद्दल पसरवण्यात येणाऱ्या अफवांबद्दल भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी जुई गडकरीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे तिला मालिकेचे शूटींग करता येणार आहे, असेही म्हटले जात होतं. मात्र आता तिने याबद्दल पोस्ट करत या सगळ्या अफवांवर सडेतोड भाष्य केलं होतं.आणखी वाचा : “मी तब्बल १० वेळा…” अभिनेत्री जुई गडकरी लग्नाबद्दलच्या प्रश्नावर असं का म्हणाली? जाणून घ्या जुई गडकरीची पोस्ट "१३ वा आठवडा नं १Only and only grateful माय बाप रसिक प्रेक्षकांचे आभार!!!तुमच्या प्रेमाने मी भाराऊन गेलेय! बघत राहा “ठरलं तर मग!”सोम- शनि रा ८.३० वाजता STAR Pravah वरआणि हो, मी ठणठणित आहे! रोज शुट करत आहे! माझ्या accident मुळे मला ”गंभीर” दुखापत झाली आणि आता मला शुट करता येणार नाही असे व्हिडियोज सध्या फिरत आहेत! त्याकडे कृपया लक्ष देऊ नये!! M alright because of ur blessings and wishes!! तसं तर युट्युब वर माझी अनेकदा लग्नं पण झालियेत आणि मला दोन मुलं पण आहेत, माझे अमेरीकेत, दुबईत बंगले पण आहेत! या गोष्टींकडे लक्ष न दिलेलंच बरं!!!असो! तुम्ही मालिका बघताय ना???" अशा आशयाची पोस्ट तिने केली आहे. या पोस्टमुळे जुईने एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. दरम्यान जुई गडकरीने 'पुढचं पाऊल' या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या मालिकेत तिने कल्याणी हे पात्र साकारलं होतं. या पात्रामुळेच तिला घराघरात ओळख मिळाली. 'पुढचं पाऊल'नंतर जुई ही 'सरस्वती', 'वर्तुळ', 'बिग बॉस मराठी' आणि आता 'ठरलं तर मग' या मालिकेत झळकली. दरम्यान या मालिकेत सध्या अनेक उत्कंठावर्धक वळण येत असल्याचे पाहायला मिळत आहे.